लहानपणी डॅशिंग म्हणून पाहिलेली माणसं मोठेपणी भेटतात तेव्हा ती म्हातारी झालेली असतात. निसर्गनियम मान्य करूनही त्यांचं म्हातारंपण बघवत नाही. एकेकाळी तडफेने चालणारे हात, डोळे मंद होतात. विझत जाण्याऱ्या ज्योतिच प्रतिबिंब त्यात दिसतं. तैलबुद्धी असलेला माणूस स्मरणशक्तीच्या हळूहळू होत जाणाऱ्या ऱ्हासाने हतबल झालेला दिसतो. गात्र थकलेली दिसतात. इथे आपल्या मनात कालवाकालव. इतक्यात कस कोणी म्हातारं झालं? किती काळ लोटला ? एक दिवस देणाऱ्याचे हात आपल्या हातात सुरकतून येतात. अनिश्चितपणा वगैरे सगळं मान्य करूनही ती संध्याछाया घाबरवून जाते. सगळं चक्र उलट फिरवावे अस मनात येत पण ते होऊ शकत नाही. मग उरते ती कासाविसता आणि आपणही त्या मार्गावर पाऊल टाकतोय ती जाणीव. अशावेळी आवंढा गिळताही येत नाही आणि बोलताही येत नाही. मूकपणे समोर असलेल्या गात्राचे शब्द ऐकावेत, लहानपणीचा मनात असलेला काळ पुन्हा जिवंत करावा एवढंच उरतं. पुलंच्या त्या दोन वस्तादाना पण तसच वाटत असेल काय ?
सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
आठवणीतील स्वातंत्रदिन!
१९४१ साली गावाहून मुंबईत आलो. तेव्हा १५ - १६ वर्षाचा असेन . ग्रांटरोडला नातेवाईक मंडळीकडे राहत होतो . त्यांच्या ओळखीने मिलमध्ये कामास लागल...
-
तर लहानपणापासून चहा हवाच असं काही ठरलेलं नव्हतं आणि ठरलेलं नसल्याने काही एक अडायचं नाही . मुळातच लहान मुलांना चहा मिळायचाच नाही . दूध पिणं...
-
१९४१ साली गावाहून मुंबईत आलो. तेव्हा १५ - १६ वर्षाचा असेन . ग्रांटरोडला नातेवाईक मंडळीकडे राहत होतो . त्यांच्या ओळखीने मिलमध्ये कामास लागल...
-
शरीरातील उष्णतेवर सब्जा हा रामबाण उपाय आहे. विशेषतः उन्हाळ्यात तलखीने जीव हैराण होत असताना सब्जा घालून पाणी प्यायलं की गार वाटतं. केरळमध्य...