लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

आठवणीतील स्वातंत्रदिन!

 १९४१ साली गावाहून मुंबईत आलो. तेव्हा १५ - १६  वर्षाचा असेन . ग्रांटरोडला नातेवाईक मंडळीकडे राहत होतो . त्यांच्या ओळखीने मिलमध्ये कामास लागलो .  वर्ष झालं .नंतर काँग्रेसच्या लोकांचे भाषण ऐकले. ते ऐकून आम्ही मुलांनी नाना चौकात जाऊन भारतमाता की जय बोललो . गांधीबाबा भारी होता . सभेत जाऊन भाषण ऐकायचो . मिलच काम कापसावर चालायचं . मग १९४७ साली इंग्रज निघून गेले . तेव्हा नाना चौकात मोठा जुलूस झाला . सगळीकडे दिवे लागले . पेढे वाटले. मिलच्या जॉबरने सांगितले तुम्हाला सुट्टी . मग आम्ही पोरे फिरायला निघालो. सगळीकडे आनंद होता. लोक खुश होते. काँग्रेसच्या लोकांनी आता आपले राज्य आले असे सांगितले . सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या . भारतमाता की जय म्हटले . नेहरू मंत्री झाला . त्यांच्यानंतर इंदिरा . 

=========================================


माझ्या ९१ वर्षाच्या आजोबांचे नुकतेच निधन झाले. एकदा कौटुंबिक समारंभात विषय निघाला असता त्यांनी या आठवणी सांगितलेल्या . तब्येत बरी होती तेव्हा वयपरत्वे जेवढं त्यांना लक्षात होत त्यांनी सांगितलं . त्यामुळे थोडेसे विस्कळीत आहे . हे सगळं तेव्हा अचंबित होऊन लक्षात राहिलेलं . आजच्या दिवशी हे सगळं इथे सांगावसं वाटलं 😊

बुधवार, १४ मे, २०२५

रिचार्ज

 आणि मग एके क्षणी मेंदूने तसेच डोळ्यांनीही शिणवटा आल्याचा निर्वाणीचा इशारा द्यावा . स्क्रीनवरच्या घड्याळ्याकडे पाहून चॅक आवाज काढत आवाराआवर करावी. 24 अवर्स सेन्टरलाईज्ड एसी ऑफिसच्या लिफ्टमध्ये शिरावं. मध्येच भेटलेल्या ऑफिसबडीजच्या " ओ !  लिटिल अर्ली लिव्हिंग टुडे ? " खोचक प्रश्नाला हॅ हॅ हॅ करत " सडनली , आय चेंज माय प्लॅन टू होम टुडे " असं कूल (!) उत्तर द्यावं. लोकलच्या प्लॅटफॉर्मवर पोचताच शिंग फुंकले रणी पवित्रा घ्यावा आणि तितक्याच उत्साहाने सज्ज होऊन लोकलमध्ये घुसावं. त्या झटापटीत आपल्या पायावर भरभक्क्म पाय पडलेला असतो त्यामुळे पाय हुळहुळत असतो  , आपला धक्का इतरांना लागलेला असतो,  बॅकग्राउंडला तू तू मैं मैं संगीत वाजत असत . तर या सगळ्याकडे सवयीच्या निर्ढावल्याप्रमाणे (!) दुर्लक्ष करावं. मग  आपलं स्टेशन येताच आपसूक उतरलं जाण्याची खात्री करून घेऊन उतरावं.  

स्टेशन येताच आज रिक्षा करावी कि चालत जावं या द्विधा मनस्थितीत सापडण्याच्या शक्यतेच्या आत काल परवाच झालेलं हेल्थ सेमिनार आठवावं आणि त्यातल यू मस्ट वॉक अटलिस्ट फॉर 45 मिनिट्स चा बुलेट स्मरणात येऊन पायी हळू हळू चालाची वाट पकडावी. चला थोडाफार तरी व्यायाम होतोय या कल्पनेने खुश व्हावं.  घर ते स्टेशन या 15 मिनिटात सगळे विचार अनविंड करायचा प्रयत्न करावा पण सकाळपासूनचा स्ट्रेस घेत चालत राहावं . 


सोसायटी येताच आपलं बॅडलक आज खूप खराब आहे हे पक्के केल्यासारखी लिफ्ट आपण बटन दाबायच्या आता टॉप फ्लोर दिशेने धावत सुटलेली असते . अश्या वेळी चरफडण या प्रतिक्षिप्त क्रियेने आधीच असलेल्या ताणात भर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन कुठल्यातरी ऑनलाइन पोर्टलवर वाचलेल्या आर्टिकल मधले 1, 2, 3,4 असे आकडे मोजावेत. शक्यतो चेहरा हसरा ठेवावा आणि घरी पोचाव . 


मग सेफ्टी डोअर वर अक्षरशः रेलून बेल वाजवावी. दिवसभराच्या साचलेल्या  ताणाच थोडा अंश हाताकडे परिवहन झाल्याने बेलचा आवाज अंमळ थोडा जास्त होतो. त्याबद्दल  दोन शब्द ऐकायचीही तयारी ठेवावी. 


दरवाजा उघडल्यावर थकलेल्या दिवसाचं रिचार्ज आपली वाट पाहत असत. दारातून आत येऊन चप्पल काढत असतानाच समोरनच हैय्या असा मोठा आवाज येतो तो चेहऱ्यावरील बोळक्या हास्यासकट.. आपल स्वतःच मिनी व्हर्जन आपली वाट बघत असत. त्या चिमुकल्या मोठ्या डोळ्यात आई आलीये असे जिंकण्याचे हसरे भाव असतात. 


मग आपलेही ओठ हसू लागतात, दमलेले डोळे फ्रेश होतात , आणि आपसूकच हात त्या पिलाचा पापा घ्यायला सरसावतात…सकाळपासूनचा ताण एका क्षणात विसरल्याच फिलिंग मग आपसूक येऊन जातं. 


सुख म्हणजे नेमकं तरी दुसरं काय असत !!!

मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४

का रे ऐसी माया !

 आज मी आणि नवरा डिनर डेटला गेलेलो दुसऱ्या लग्नगाठवर्षपूर्ती निमित. 

गेलो खरे पण मनात बाळ कधीही उठेल आणि पळत घरी लागेल ही भीती होतीच . त्यामुळे घराजवळ एक नवीन रेस्तरा ओपन झाले आहे तिथे गेलो . सुदैवाने चांगले निघाले ते होटल. मेन्यू आणि सर्विस छान होते .

दीड एक तासाने घरी गेलो तर बाळ नुकतेच उठलेले . ट्याव ट्याव. सुरू केलेली . वेळेत पोचलो म्हणून हुश्श केले .

यापुढे बाळ पुरेसे मोठे होईपर्यंत कुठे एकटे जाता येणार नाही पूर्वीसारखे . गेले तरी अर्धा जीव घरी . खरेतर ज्या दिवशी प्रेग्नसी न्यूज कळलेली त्या दिवसापासूनच जबाबदारीला सुरुवात झालेली. डॉक्टरी चाचण्या , औषधे , दर दिवसाआड घेतली जाणारी इंजेक्शने, १५ दिवसांनी सोनोग्राफी करताना सगळे काही ठीक आहे ना वाली घालमेल या सगळ्यातून ९ महिने दिसमाजी वाढत गेलेला तो जीव जेव्हा हातात दिला गेला तेव्हा वाटल होत ते लिहिणे अवघड . ते काम डोळ्यातून येणाऱ्या पाण्याच . त्या अश्रूची सोबत आता जोडीला . बाळ शिकताना , मोठे होताना , मार्गी लागलेल पाहताना . 

अश्या वेळी आई आठवली . आयुष्यभर कष्ट करून ती मात्र मार्गी लागलेल बघू शकली नाही . आई झाल्यानंतर आईची आठवण अधिक तीव्रतेने झाली . ती ही याच सगळ्यातून गेली असेल . भल्या मोठ्या घरात सासूच्या दमाखाली काम करत असताना , पोटातले मूल वाढत असताना हेच सगळ तिने अनुभवले असणार . तिच्याशी भांडताना , रुसवे फुटावे करताना , तिच्या  अपेक्षाची पूर्ती न करता हवा तोच हेका चालवताना काय वाटले असेल तिला ! 

आई झाल्यावरच  स्वतःची आई का कळते ! 
पालकत्व सुरू झाले आता … 

०२ डिसेंबर २०२४ 

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२

सरता काळ

 लहानपणी डॅशिंग म्हणून पाहिलेली माणसं मोठेपणी भेटतात तेव्हा ती म्हातारी झालेली असतात. निसर्गनियम मान्य करूनही त्यांचं म्हातारंपण बघवत नाही. एकेकाळी तडफेने चालणारे हात, डोळे मंद होतात. विझत जाण्याऱ्या ज्योतिच प्रतिबिंब त्यात दिसतं. तैलबुद्धी असलेला माणूस स्मरणशक्तीच्या हळूहळू होत जाणाऱ्या ऱ्हासाने हतबल झालेला दिसतो. गात्र थकलेली दिसतात. इथे आपल्या मनात कालवाकालव. इतक्यात कस कोणी म्हातारं झालं? किती काळ लोटला ? एक दिवस देणाऱ्याचे हात आपल्या हातात सुरकतून येतात. अनिश्चितपणा वगैरे सगळं मान्य करूनही ती संध्याछाया घाबरवून जाते. सगळं चक्र उलट फिरवावे अस मनात येत पण ते होऊ शकत नाही. मग उरते ती कासाविसता आणि आपणही त्या मार्गावर पाऊल टाकतोय ती जाणीव. अशावेळी आवंढा गिळताही येत नाही आणि बोलताही येत नाही. मूकपणे समोर असलेल्या गात्राचे शब्द ऐकावेत, लहानपणीचा मनात असलेला काळ पुन्हा जिवंत करावा एवढंच उरतं. पुलंच्या त्या दोन वस्तादाना पण तसच वाटत असेल काय ?

सोमवार, १८ जुलै, २०२२

My Costly Affair

 My Costly Affair


“What’s in a name? That which we call a rose. By any other word would smell as sweet.“ William 

Shakespeare wrote in famous ‘Romeo and Juliet’. 

Well Well, though calling rose a sunflower does not diminish its smell, but it does cost heavily if 

someone pronounces your name weirdly. 

So the incident happened during my flight from Delhi to Mumbai. It was an Indigo airlines. 

Everything was under control. At least at that point! Yes! I didn’t forget my ticket, took printed 

copies , my small backpack was properly packed, reached airport well before time to avoid Delhi 

traffic and completed all security checks . Then ticked all points correctly in my checklist as 

everything was OK. What a relief! It was a bright sunny day of March. So there was no sign of 

weather disturbance. As a practice, I got my tickets stamped. Since there was much more time left 

for the flight, I decided to roam around through Beautiful Indira Gandhi Airport. Indeed! The airport 

is beautiful. 

After sometime, I got bored of roaming. Hence I decided to read a book. I just glanced my watch. 

Well there was still time for flight. And yes, all was well by that time. 

Time had passed. I received phone call by mum. She called me to check whether I boarded my flight. 

Suddenly I felt of waking up and murmured myself about flight. I checked wristwatch and astonished 

that why the announcement was not made about flight. I rushed to ticket counter and asked 

attendant whether the flight was delay or some problem occurred? 

I felt that my heart pumped at the supersonic speed by hearing her answer. Yeah! The Answer was 

“THAT FLIGHT HAD TAKEN OFF!”

 

Oh my god! How is it possible? I just got feared and felt helpless. 


I  became worried. Having some angry tone in my voice, I asked her “Madam, did you announce my 

name before allowing flight to take off?“ She plainly said “Yes, Madam. We have announced your 

name thrice. There was no response from your side.” Again I got surprised and told her that I have 

never heard that my name is being announced. But she was stuck to her point firmly. On other side, I 

was damn sure that I hadn’t heard announcement. We, both defending our points consistently. 

And suddenly I realised something. Something that I had faced many times. Yeah! It was my name. 

They announced my name but in a very bizarre manner. I got clue from attendant’s intonation. She 

was pronouncing my name in an incorrect way. I had faced different version of my name till now and 

I was used to it. People utter/write my name as per their convenience. It can be anything 

“zhai”/”Jae”/”jayee”/Zai”/Jaiee” to name a few. And I understand it only to feel pity on myself. 

But this time, it was different. They called my name in such a wrong way that I myself couldn’t 

understand that my name was being announced. Hence, in this way, my missed my flight. How 

helpless I felt that day! No one to blame, No one on whom I could be angry. Since there was no use 

of arguing with attendant, only option was to book another flight. I followed rituals, boarded next 

flight and reached Mumbai by paying return journey fare for single trip. How Costly affair it was! 

So I learned 2 lessons in whole Incident. 1. Never read book while waiting. 2. Pay extra attention to 

announcement. Huh! I will never forget that incident. 

If Shakespeare would have lived today, I would have narrated him above incident and told him that I 

strongly object to “what’s in name”. I am sure, he would have agreed to change his statement to 

“Yes, All is in name”.


P.S. - I got a prize for this write up in writing competition named as "your bizzare travel experience" .Hence Cost is partly compensated ;)

गुरुवार, २६ मे, २०२२

To step into his/her shoes

 शाळा कॉलेजातले आवडते शिक्षक , पूर्वीच्या नोकरीतले सीनियर्स अचानक भेटतात , काय कस चाललंय चौकशी करतात, तेव्हा अगदी मस्त  फिलिंग येऊन गेलेलं असतं. चेहऱ्यावर नकळत आनंद पसरून जातो..त्या पाच दहा मिनिटाकरता आपण नकळत त्या दिवसात भर्रकन फिरून आलेलो असतो  . 


मग काही काळाने  काही एक महिन्यांपूर्वी , वर्षाआधी तुम्हाला ज्युनियर असलेले ट्रेनीज , इंटर्नस , तुमचे विद्यार्थी तुम्हाला अचानक एका वळणावर भेटतात . हॅलो मॅम ! , ओह यू हाऊ आर यू करत संवाद साधला जातो .. त्यांचं सगळं मस्त  चालेलेल पाहून नकळत आपल्यालाच छान वाटून जातं.. कुठेतरी स्वतःलाच बरं वाटून जातं.. 


To step into his/ her shoes हा इंग्लिश भाषेतला माझा आवडता वाक्यप्रचार .!. आणि बिलिव्ह मी , स्वतःच्या शिक्षकांच्या , सीनियर्सच्या शूजमध्ये स्टेप इन होताना आलेलं एक भारी भन्नाट फिलिंग उरलेल्या दिवसाला हॅपी बनवून जातं ..

शनिवार, ९ एप्रिल, २०२२

दास्तां ए बड़ी बांका !!!


गोष्ट सांगण हा प्रकार आपल्याला नवीन नाही. आईच्या , आजीच्या गोष्टी ऐकत आपण मोठे होतो. पोवाडा , गवळण इत्यादी साहित्य प्रकार  आपल्या परंपरेत आहेत. 

उर्दू साहित्यात या गोष्ट सांगण्याच्या प्रकाराला "दास्तानगोई" अस नाव आहे. यातल दास्ता ह्या शब्दाचा अर्थ गोष्ट आणि गोई म्हणजे सांगण. या प्रकाराची सुरुवात मुघल शासन काळात झाली. मुघल राजांच्या दरबारात दस्तांगो म्हणजे गोष्ट सांगणारे हा कलाप्रकार पेश करत. अर्थातच हा प्रकार दरबारी असल्याने पुरुष कलाकारच  सादर करत असत. ही कला  १९ व्या शतकापर्यंत दिल्ली , लखनौ इथे  बराच लोकप्रिय होती. १९२८ साली ही कला सादर करणारे दास्तागो मीर बकर अली यांच निधन झालं आणि ही कला जणू लुप्त पावली.  नंतर २००५ साली महमूद फारुकी यांनी या कलेच पुनरुज्जविन केलं. 

दास्तां गोइ प्रकाराला विषयाचं बंधन नाही. युद्ध, प्रेम , जादू, धोका , दुःख अश्या कोणत्याही विषयावर दास्ता गोईं सादर करता येते. ऐकण्यार्याच मनोरंजन करण हा मुख्य हेतू . 

तर ही कल्पना घेऊन अक्षय शिंपी आणि धनश्री खंडकर हे दोन  दास्तांगो  "दास्ता ए बडी बांका " नावाची मुंबई शहर ही थीम असलेली दास्ता गोई सादर करतात. गोरेगावच्या केशव गोरे ट्रस्टच्या सभागृहात या दास्ता गोइचा २५ वा प्रयोग आज पाहायला मिळाला. जवळपास दोन तासाचा हा प्रयोग आवर्जून बघावा असा आहे. किस्से, कहाण्या , चिमखडे बोल, विचार करायला लावणारी वाक्य, अचूक संदर्भ असणाऱ्या आणि योग्य ठिकाणी पेरलेल्या कविता , अधून मधून सांप्रत स्थितीवर घेतलेले चिमटे यामुळे प्रयोग रंगतो. प्रयोगाचा ठराविक असा फॉरमॅट नाही. त्यामुळे प्रेक्षक निवांत होत नाही. पुढे काय असेल ह्याची उत्सुकता निर्माण होते. कुठलीही गोष्ट सांगताना साधी सरळ असली की त्यात काही रस राहत नाही. इथ तस होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली गेलीय. अक्षय आणि धनश्री हे दोघेही प्रचंड ऊर्जा असणारे कलाकार आहेत. त्या उर्जेचा पुरेपूर वापर प्रयोगात झालेला दिसतो. दोघांचं टायमिंग , योग्य वेळी घेतलेल्या जागा प्रयोग रंगतदार बनवतो. काहीसा इतिहासावर आधारित असूनही केवळ घडलेल्या घटनांची जंत्री न राहता ते क्षण आता आपण अनुभवत आहोत असा फिल प्रयोग पाहताना येतो. मुंबापुरीची चांगली वाईट वैशिष्ट्य वेगवेगळ्या ढंगात सादर करण्याची कला या दोघा कलाकारांनी लीलया साधली आहे. केवळ एक गादी आणि पाण्याचं दस्त या प्रॉपर्टीजवर , आवाज आणि शरीराच्या देहबोलीतून मुंबईच विश्वरुपदर्शन हे दोघे कलाकार घडवतात. 

आता काही अधिकाच्या अपेक्षा : प्रयोगाची संहिता गोळीबंद आहेच पण त्यातील काही भागांवर  थोडी कात्री चालवण हे इतर विषय घेण्याच्या दृष्टीने बर पडेल असं वाटत राहिलं . उदा . सुरुवातीचा प्राथनेचा भाग. तो जरा मिसमॅच वाटतो. त्याऐवजी मुंबईत विकसित झालेलं आयटी कल्चर , व्हाईट कॉलर टॉवर संस्कृती , गुज्जू, जैन यांचं मुंबईवर झालेलं सायलेंट  "अतिक्रमण" , इथली चित्रपटसृष्टी , कॉस्मो संस्कृती, एकंदरीतच मुंबैची उपनगर यांची नोंद प्रयोगात घेतली गेली पाहिजे अस वाटत राहिलं.

मुंबै ही आंधळ्याच्या हत्तीसारखी आहे. जो तो आपल्या कुवतीप्रमाणे तिचं वर्णन करतो. इतक्या दशकांचा इतिहास लाभलेल्या मुंबैच दर्शन दोन तासात घडवण अवघड आहे. पण या दोघांनी कलाकारांनी ते शिवधनुष्य लीलया पेलले आहे. या प्रयोगाचं रूपांतर पूर्ण लांबीच्या नाटकात व्हावं ही इच्छा आहे. प्रेक्षकांनीही आता या वेगळ्या प्रयोगांना साथ द्यावी ही अपेक्षा. 

या प्रयोगाना नेपथ्य वगैरेची भानगड नाही . घरी , सोसायटीत , ज्येनाच्या मंडळीत प्रयोग सहज सादर करता येतील .

रविवार, ४ एप्रिल, २०२१

साडीची गोष्ट !!!

 माझ्या लहानपणी माझी आई ऑफिसात साड्याच नेसून जायची. मध्यमवर्गात त्या काळात सलवार सूट घालणे म्हणजे क्रांती . त्यातूनही सरकारी हापिसात ड्रेस घालणे म्हणजे contempt of court. मला आठवतंय मी एका कामानिमित्त अंधेरीत असलेल्या सीमाशुल्क ऑफिसात जीन्स घालून गेले होते. खरंतर मुद्दाम अस काही केलं नव्हतं. त्यावेळी खरंतर लक्षात आलं नाही आणि कामाच्या घाईत  तेवढा वेळही नव्हता. तर तिथल्या सरकारी बाबूंनी कुठला परग्रहावरील माणूस इथे आला असा लूक दिलेला. (माझं लहानपण ते उच्चशिक्षण होऊन य वर्ष लोटली तरीही . तर त्या अश्या सगळ्या प्रकारांमुळे कितीही वेळ झाला तरी आई साडीच नेसायची. आता साडी नेसण म्हणजे वेळखाऊ काम. परकर , ब्लाउज , पिन वगैरे सगळं रेडी ठेवावं लागतं. त्यात माझी आई म्हणजे एकदम भारी काम . साडी नीटच व्यवस्थित नेसली पाहिजे असा तिचा बाणा. सकाळची स्वयंपाक त्यात हे साडी प्रकरण. त्यामुळे ती लवकर उठून सगळं करायची. तिची ती सगळी लगबग गडबड बघून मला  साडी या प्रकाराबद्दल फारसं ममत्व नव्हतं. सकाळच सगळं करून, साडी नेसून  ठरलेली ९.१५ ची ट्रेन गाठणं हे तीच रुटीन. तर मला एवढ्या सकाळच्या घाईत तिची साडी नेसायचीच जबरदस्ती काही झेपायची नाही. पण त्याच्या मागच कारण मला नंतर कळलं जे वर लिहिलं आहेच. माझ्या आईला साडी ते सलवार सूट अस ट्रान्सफॉर्मेशन करायला माझं सीएस पूर्ण व्हावं लागलं. ते ही तिला खूप कंव्हीस केल्यावरच.

माझा स्वभाव घोळ घालत बसायचा नाही. मला सुटसुटीत कपडे अधिक आवडतात.कॉलेजमध्येही साडी डे असायचा तेव्हा मी  सलवार सूट घालून गेलेले. मैत्रिणींनी लावलेले बोल देखील चूपचापपणे ऐकून घेतलेले. ह्यात माझ्या कम्फर्टनेसचा भाग अधिक होता. 
खरंतर कामानिमित्त अनेक महिला आयएसएस ऑफिसरना /  कॉर्पोरेट सीईओना साडीत पाहिलेलं  आहे. उदाहरणार्थ मनीषा म्हैसकर, चंदा कोचर. या पॉवर वुमन ज्याप्रकारे ग्रेसफुली त्या साड्या नेसतात ते मला आवडतं. त्यात साडीचा रंग , चॉईस , accessories बरोबरच त्या पदाचा swag ही असतो. आणि मग मला मोह होतो साडी नेसायचा. पण साडी नेसायची म्हटली की आईची लगबग समोर यायची आणि मग माझा कॉन्फिडन्स हरवून जायचा. 
तर मग कॉलेजात टाळलं तरीही ऑफिसतले साडी डेज काही चुकले नाहीत. तिथे एच आर नावाचा प्राणी आणि टीम बिल्डिंग नावाचं पॅकेज अपरिहार्य असतं. तिथे कारणं चालत नाहीत. मग नवीन ऑफिस जॉईन केल्यावर एचआरचा दिवाळीनिमित्त इमेल आला ट्रेडिंशनल डे साजरा करायचा. मग काय ! आईकडे तिची साडी मागितली. पण तिने जीन्स , टॉप वगैरेची खरेदी पुरे झाली , आता जरा साड्याकडे बघ या निमित्ताने अस सुचवलं. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी आणि आई साडी खरेदीस गेलो. तिथल्या साड्यांचे एक एक प्रकार बघून माझी अवस्था घेशील किती दोन कराने अशी झाली. माहेश्वरी , नारायणपेठ, पैठणी , सिल्क , चंदेरी, खादी,जमदानी  अश्या कितीतरी प्रकारच्या साड्या !!! 
एक दोन साड्या दाखवून होताच दुकानदारला माझे साड्याविषयक प्रगाढ ज्ञान " अंकल , वो साडी मुझे फिट नहीं होगी प्रॉपर" या कमेण्टवरून लक्षात आले असावे , त्यामुळे माझ्या बाकीच्या प्रश्नांची उत्तरे द्यायच्या भानगडीत न पडता त्याने इथे बॉस कोण आहे ते ओळखले आणि आई सांगेल ती साडी दाखवायचे सुरू केले. बरीच भवती न भवती केल्यावर अखेरीस निळी साडी  आईच्या आणि माझ्या पसंतीस आली. साडी खरेदी तर झाली , आता पुढची पायरी म्हणजे ब्लॉउज आणि इतर खरेदी. या प्रकाराने चांगलेच दमवले. परकरची योग्य शेड शोधण्यापासून ते टेलरला कश्या प्रकारचे ब्लॉउज हवे आणि त्याची डिलिव्हरी कधी देणार यापूर्ण प्रकारावर मातोश्रीनी चांगलेच बौद्धिक घेतले. दोनेक तास तरी त्या मार्केटमध्ये फिरत होतो. बरं हे सगळं झाल्यावर साडी नेसवणार कोण ही समस्या. माझ्या आईला काही हे जमत नव्हतं. मग आमच्या स्वयंपाकाच्या काकू धावून आल्या. त्यांनी साडी नेसायला मदत केली चांगल्या 4 ते 5 पिना लावून. त्यातही मध्येच साडी सुटली तर काय करायचे ह्यावर मोठं लेक्चर झोडल.एवढे सगळे सव्यापसव्य झाल्यावर प्रत्यक्ष ऑफिसात जायची वेळ आली तेव्हा पंचाईत झाली. ट्रेनने काही मला जमणार नाही अस जाहीर केलं तेव्हा मातोश्रीनी काय ह्या आजकालच्या मुली असा तुच्छ कटाक्ष टाकला आणि रिक्षेची सोय केली. ऑफिसात गेल्यावर तिथे वेगळंच वातावरण ! जेन्ट्स पुरुष कुर्त्यात एकदम एन्जॉय करत होते , काही सराईत लेडीज बाया साडी नेसून मस्त वावरत होत्या. आमच्यासारख्या पहिलटकरीण एकदम अवघडून गेलेल्या. बरं! ट्रॅडिशनल डे होता म्हणून एच आरने कामात सूट दिली नव्हती. काम होतच. आणि अश्यावेळी नेमकं ते अर्जंट असत. त्यामुळे ते एक टेन्शन. साडीची सवय  नसल्याने माझ्या सहकारीणीला मला टेन्शन आलेय साडीचे  म्हणून १० वेळा सांगितलं तेव्हा तिने वैतागून तू. क. दिला आणि आता लंचपर्यत अजिबात खुर्चीतून उठू नकोस अस बजावलं. निमूटपणे ऐकून घेण्यावाचून पर्याय नव्हता. पण लंचपर्यत मी जरा सैलवलेले आणि थोडं रिलॅक्स पण वाटू लागलेल. त्यामुळे लंचनंतर फोटोसेशन करून धमाल केेली. बॉसनेही मूड बघून कामाची खळखळ केली नाही. दिवस संपला, घरी परतताना रिक्षाच केली. कधी एकदा साडी सोडून रिलॅक्स होतेय अस झालेलं.फरफरा साडी सोडून , पिन अप काढून मोकळा श्वास घेतला.
 हे सगळं बघून मातेने कठीण आहे असा लूक दिला आणि आम्ही कश्या जायचो ऑफिसात , या मुलींना काहीच जमत नाही असा शेरा मारला. तर तुसी ग्रेट हो माँ  हा रिप्लाय देऊन चहा दे ना ची गळ घातली

तर अशी ही माझ्या साडी नेसण  या प्रकाराची गोष्ट. पुढच्या वर्षीच्या ट्रेडिंशनल डेला ही हाच एपिसोड थोड्याफार फरकाने रिपीट झाला. पण तेव्हा अनुभव असल्याने इतकं काही वाटलं नाही. आतातर  साडी नेसायची तर काय करावं लागतं आणि  नेसल्यावर काय करायचं असत याची  कल्पना आलेली आहे. पण आजही साडी नेसायची म्हटलं की ओह असा मनाशी येतच  आणि टेन्शन येतच.  पण कधीमधी ट्राय करायला हरकत नाही , वर्षातून किमान तीन वेळा तरी साडी नेसायचीच अस ठरवलं आहे  प्रॅक्टिस सुटू नये म्हणून . आता आई हयात नाही मार्गदर्शन करायला पण जमेल आणि जमवणारच आहे. 

सोमवार, २२ मार्च, २०२१

नवरात्र

 नवरात्रीच्या विशेष अश्या आठवणी म्हटल्या की आठवतं ते गरबा , बाजारातील धांदल , मामांचे उपवास, जोडून येण्याऱ्या सहामाही परीक्षा, त्यासाठी करावा लागणारा अभ्यास त्यानंतरच्या दिवाळी सुट्टीच आकर्षण . पण जरा स्मृतीला ताण दिला की अजून आठवतात ती फूल (हेच आडनाव होतं) आणि आनंद ही आडनावं असणारी पंजाबी कुटुंब.

अस्सल धडधाकट आणि पंजाबी कुटुंब ! पैकी आनंदज मधला राहुल हा अत्यंत मस्तीखोर म्हणून पूर्ण कॉलॉनीत प्रसिद्ध . इतका आडदांड नी टिपिकल पंजाबी कुटुंबातील. दर दोन दिवसाआड शाळेत त्याच कोणाशी तरी भांडण असायचच. मग त्या मुलांच्या आईन राहुलच्या आईकडे तक्रार करणं , मग राहुलच्या आईने राहुलची वरात शाळा ते सोसायटी अशी काढणं ठरलेलं असायचं. 'राहुलने फिरसे आज कुछ किया लगता है ' बडबडत म्हातारी जिजी बाल्कनित बसलेली दिसायची. दोन्ही आनंद अंकल मात्र कधी भानगडीत पडताना दिसले नाहीत. मुलांना वाढवणे हे बायकांचे काम ही त्यांची समजूत . खरंतर दोन्ही आनंद आंटीज एकमेकींच्या बहिणीच होत्या सख्ख्या. गोऱ्यापान , काश्मिरी सफरचंदासारखी रसदार त्वचा. एकाच घरात दिलेल्या. पण अस असलं तरीही रोजची भांडण काही चुकायची नाहीत त्यांची. बहिणीपेक्षा जावा जावा हे नातं वरचढ ठरत असायचं .. भांडण झाले की थोड्या वेळाने सगळं आलबेल . या नात्यामुळे राहुल आणि पूनमला( त्याची चुलत बहीण /मावशीची मुलगी) आम्ही मुलं तुम्ही तुमच्या आयांना माँसी बोलावता की चाची म्हणून चिडवायचो. याउलट फूल अंकल आणि आंटी शांत स्वभावचे होते. मुलगा अमेरिकेत असल्याने इतरांशी जेवढ्यास तेवढे संबंध !!!
नवरात्रात मात्र आम्हाला विशेषतः मुलींना या दोन्ही कुटुंबाकडून एकदम राजेशाही ट्रीटमेंट ! याच कारण माताजींच दोन्ही कुटुंब एकदम भक्तिभावपूर्वक करायची. उधळलेल्या खोंडागत वागणारा राहुलही यावेळी एकदम शांत असायचा. साधारणपणे नवरात्रीच्या पाचव्या , अष्टमी , नवमीला आम्हा मुलींना स्पेशल आमंत्रण ! सकाळी एक १० च्या सुमारास मुलींच्या आयांना विचारून बोलवून घेतलं जायच. ६०च्या जिजी आणि दोन्ही आंटीज जातीने आमचे पाय वगैरे धुवून स्वच्छ करायच्या. मग माताजींका टिका लावायचा. प्रत्येकीला गुलाबाची फुल द्यायची ! देवीप्रमाणे पूजा करून ओवाळून घ्यायचं आणि आमच्या पाया पडायचं. खरी गंमत पुढे.. प्रत्येकीला हेअरक्लिप , नेलपेंट , पैसे ( प्रत्येकी ५ रुपये) , रुमाल, चुनरी अस काही ना काही मिळायचं. त्यावेळी पॉकेटमनी नामक हा प्रकार नव्हता. त्यामुळे ते मिळालेले आखे ५ रुपये मी माझ्याकडेच ठेंवणारे अस मी जाहीर करूनच यायचे. वर्षातून एकदाच हे सगळं असल्याने मातेची पण काही आडकाठी नसायची. हेअर क्लिप वगैरे मधून खास पंजाबी चॉईस दिसायची. सगळं एकदम चमचमीत आणि भडक. मला अजून आठवतं नवीन लग्न होऊन माझी मावशी आमच्याकडे आलेली . तेव्हा तिने टिपिकल ममव पद्धतीने मोजकेच दागिने आणि हलका मेकअप केलेला. दरवाज्यावरच फूल अंकल भेटले. त्यांनी तिला " बिटीया , नई नई शादी हुयी है तो कुछ अच्छे कपडे पहानो करो, दुलहन जैसी लगने चाहीये " असा सल्ला दिलेला. ते आठवून आम्ही आजही असतो. तर ते देवीचं सगळं अस भेटवस्तू मिळणं पंजाबी स्टाईलच. दुसऱ्या दिवशी शाळेत घेऊन गेलो की दोन दिवस त्यावर चर्चा ठरलेली. या भेटवस्तूबरोबरच खास पंजाबी पद्धतीचा भरपूर तूप निथळत असलेला गव्हाचा शिरा, त्यासोबत पुऱ्या आणि चण्यांची भाजी. या खाण्यात वगैरे मला इंटरेस्ट कमी असल्याने मी ते सरळ आईला नेऊन द्यायचं काम करायचे. तर 'मोठं' होईपर्यत हे सगळं अनुभवलं . त्यादिवसात पाया पडून घेणं, पूजा करवून घेणे हा आपला हक्क आहे असेच वाटायचं. बंधूरायांना या दिवसात फिलिंग जेलसी यायचं ते भांडण होईपर्यंत टिकायचे. कारण त्यांच्या हाती भोपळाच ..
सोसायटीच्या टॉवरपूर्व काळात ही दोन्ही कुटुंब भाईंदरवगैरे भागात राहायला गेली. तिथून पुढे काहीच संपर्क राहिला नाही. सगळे मोठे झाले . पूनमकी शादी हो गयी ( तिचं ते स्वप्न होतं) , फूल अंकल ह्या जगात नाहीत इतकंच कळलं. नवरात्र म्हटली की आठवतं ते इतकंच !!!

जनरलायझेशन / गृहीतक

 जनरलायझेशन / गृहीतक हा लोकांच्या जगण्याच्या एक भाग आहे असं कधी मधी वाटू जातं. आता ह्यात लोकांच्या बिनडोक असण्याच्या भाग किती , डोक्यात घुसलेल्या किंवा घुसडवलेल्या पूर्वग्रहदूषिताचा भाग किती हे नीटस माहीत नाही. X गोष्ट अशी आहे मग त्या अनुषंगाने Y गोष्ट पण तशीच असणार ही गृहीतक बघून मजा येते कधी मधी.

म्हणजे आता बघा खूप शिकलेल्या मुलीना ( शिकलेली मुलगी हे मुळात पाssप , त्यातून जरा जादा शिकलेली म्हणजे महापाप ) स्वयंपाक पाणी जमणारे नाही हे जनरलायझेशन / गृहीतक .त्यांनी मग स्वयंपाकघरात पाऊल ठेवताच (इथे आश्चर्ययुक्त इथे कुठे वाट चुकली भाव असलेल्या नजरा प्रथम झेलाव्या लागतात) patronizing करत न मागता दिलेल्या सल्लाची चवड सुरू. मग आता पाऊल ठेवलच आहे तर मग तिला काहीही येत नाही हे गृहीत धरून अत्यन्त बेसिकपणाची बडबड. अर्थातच त्या मुलीने ही बडबड शांतपणे ऐकून घ्यायची असते. मग पाळी येते ती हात धरून शिकवण्याची. एवढ्यातच मग बालिश सल्ले ऐकून मुलीचा प्रेशर कूकरचा व्हॉल्व्ह वाफ मोकळ होण्यासाठी धडपडत असतो पण तरीही डोकं शांत ठेवून हो हो करत राहायचं. पण मग थोडं तडकायला होतेच आणि मग त्या गरम वाफेचा चटका सल्लेकरी मंडळींना बसतो.तेव्हा मग ठीक है बाई , तुझं तू बघ म्हणत अंग झटकले जातं आणि सुटका होते पण ती तात्पुरती . कारण फायनल प्रॉडक्टच ऑडिट बाकी असतं.(त्यात फजिती होणारच आहे हे गृहीत धरून टोमणे सल्ले तयार असतात) .
एकदाच फायनल प्रॉडक्ट तयार झालं आणि ते मग आपल्यापेक्षाही सरस आहे हे लक्षात येताच अश्या सल्लेकरी मंडळींचा धीर खचू लागतो. पण मग नाक पडलेय हे मान्य तरी कसे करायचे!!! "होय ग , जमलं की तुला. थोडं फक्त अस हवं होतं पण जमेल पुढे " करत सारवासारव होते. पुढे मग " शिकलेय म्हणजे अगदीच काही ही नाही ह " असा आहेर मिळतो.
हीच ती वेळ असते बोलती बंद करायची. ही संधी सोडायची नाही. मग फायनल नेल इन द कॉफीनसाठी अजून एक खिळा ठोकायचा "काकू आता मी स्वयंपाक केला , आता ना तुम्ही माझी बॅलन्सशीट , लीगल document तयार करून द्या, दमले की बाई मी, जमेल ना तुम्हाला ? मी शिकवते की . चला नवीन काहीतरी शिकू आज " हे अत्यंत लाडिकपणाने म्हणायचं.. हे ऐकताच काकूंच्या चेहऱ्यावर वाजले की बारा हे भाव आणि मुलींच्या चेहऱ्यावर तेंडुलकरने त्या झिम्बाबेच्या खेळाडूला एकापाठोपाठ मारलेल्या सिक्सरचे भाव !!! प्रचंड आत्मिक समाधान म्हणजे काय असतं तो अनुभव येतो अश्यावेळी . बाजी पालटू लागलेली असते. काकूंच्या डोक्यात, चेहऱ्यावर कुठून हिच्या नादी लागलो हे भाव .. हॅ हॅ हॅ करत चला पानं वाढू करत काकू अचानकपणे दिसेनाश्या होतात.

गुरुवार, १८ मार्च, २०२१

विंडो शॉपिंग

 घरापासून जवळपास एक मॉल आहे. म्हणजे येण्याऱ्या जाण्याऱ्या रस्त्यावरच आहे. मॉल म्हटलं की दर्शनी भाग महत्वाचा. दर्शनी भागावर नेमकी कपड्याची छान छान दुकानं आहेत. मॉल जेव्हा पहिल्यांदा सुरू झाला तेव्हा मी कॉलेजात होते . दुपारी परतताना त्या कपड्यांच्या दुकानात असलेल्या मॉडेलवर नजर टाकणे हा छंद होता. काही काही ड्रेस खरंच सुंदर असायचे .इतके सुंदर की लगेच घेऊन टाकावेत आणि मिरवावेत असे. पण तेव्हा विद्यार्थीदशेत होते , मिळण्याऱ्या पॉकेटमनीत ड्रेस परवडणारे नव्हतेच आणि मातोश्री भलते लाड पुरवणाऱ्या नव्हत्याच. त्यामुळे विंडो ड्रेसिंगद्वारे नेत्रसुख हा एकच पर्याय होता.

*कट २*
पुढे यथावकाश नोकरी लागली. त्यामार्गे स्वतः ड्रेस विकत घेण्याची पतही आली. आजही त्या मॉलमध्ये ती दुकाने आहेत. दर्शनी भागात छान छान ड्रेस घातलेल्या मॅनेक्वीन आहेत . थोडक्यात मौका भी है और दस्तुर भी . पण आता ड्रेस विकत घ्यायची इच्छा होत नाही. तेव्हा त्या गोष्टीच अप्रूप होत. आजही त्या रस्त्यावरुन जाताना ते सुंदर ड्रेस दिसतात आणि अप्रूप वाटत . पण पुढे जायची इच्छा होत नाही . एखादी गोष्ट अस्पर्श राहावी , ती मिळून तिचं अप्रूपपण संपू नये असं काहीसे फिलिंग येते आणि त्यामुळे पाऊल पुढे टाकलं जात नाही. खूप सारी मेहनत करून एखादी। गोष्ट मिळवावी नि हातात आल्यावर हांतीच्या ! एव्हढ्यासाठी अट्टाहास करत होतो होय अस काहीसं होत.
कदाचित काही गोष्टींची मजा विंडोशॉपिंगमध्येच असावी

ओ_वुमनिया

 भारतात स्त्रीशिक्षणाचा पायंडा सावित्रीबाई फुलेंनी पाडला आणि वर्षानुवर्षे अंधारात असलेल्या स्त्रीवर्गाला प्रकाशाची वाट दिसली. सुरुवातीला मुली शिकल्या की डोक्यावर बसतील म्हणून खळखळ करण्याऱ्या भारतीय समाजाने हळूहळू मुलींचं शिकणं मान्य केलं. मात्र या शिकलेल्या मुली आपल्याच ताब्यात राहाव्यात , जुन्या काळापासून आलेल्या परंपरा तश्याच चालत राहाव्यात ही मानसिकता कायम होतीच. त्यामुळे मुली कितीही शिकलेल्या असोत त्यांना घरकाम , स्वयंपाकपाणी आलंच पाहिजे हे कटाक्षाने बघितलं जायच. साधारणपणे बँक , शाळेत नोकरी त्यांनतर वयाच्या पंचविशीपर्यत लग्न , त्यानंतर मुलं अशी व्यवस्था ९०च्या दशकापर्यत कायम होती. थोडक्यात स्त्रियांची भूमिका नेहमीच दुय्यम असणारी. समाजाच्या या मानसिकतेच प्रतिबिंब भारतीय जनमानसावर प्रभाव पाडण्याऱ्या चित्रपट या माध्यमात न पडत तरच नवल. हिंदी / मराठी चित्रपटातील त्या काळच्या नायिका म्हणजे नायकाच्या प्रेमप्रकरणाची गरज भागवण्याऱ्या , पटकथेत चिमूटभर सजवण्यापूरत रोल असण्याऱ्या आणि तो रोलही प्रामुख्याने टिपिकल शामळू मुलींचाच. या मुली जास्तीत जास्त एमए शिकलेल्या असत. त्या खानदान की इज्जत वगैरे मानत, वडीलधार्यांनी ठरवलेल्या स्थळाशी लग्नगाठ बांधण्याऱ्या , त्यासाठी आपल्या प्रेमाला तिलांजली देण्याऱ्या ,लग्नापूर्वी शारीरिक संबंध म्हणजे रौरवनरकाच पाप , नवरा म्हणजे सर्वस्व , लग्नानंतर मुलंबाळात रमण्याऱ्या , सगळं सांभाळून असण्याऱ्या, प्रेमस्वरूप , मातृस्वरूप , वात्सल्यपूर्ण अश्या स्वरूपात असत. त्यांच्या चित्रपटातील अस्तित्वाला तसाही अर्थ चटणीसारखा . तोंडी लावायला.

हे नाहीतर मग या शामळूपणाच दुसरं टोक म्हणजे व्हॅम्प भूमिका करण्याऱ्या स्त्रिया. या बाया व्हिलनला रिझवायच काम करत . अगदीच गरज पडली तर त्याच्या वतीने खूनबिन छळकपट पण करत. पण त्याही चार पाच सीनपुरतं मर्यादित. आखी स्टोरीलाईन हिरो आणि व्हिलनपुरतं सीमित झालेली.
नाही म्हणायला अपवाद अर्थ , मिर्चमसालासारख्या चित्रपटांचा. पण ते तुरळक .
आर्थिक उदारीकरणानंतर मात्र भारतीय समाजात बरेच बदल घडून आले. मेट्रो शहरांचा उदयही ह्याच काळातील. भारतीय समाजात बऱ्यापैकी नवे वारे वाहू लागले ते या काळात.शिक्षणाची गंगा याच काळात घरी पोहोचली आणि या शिक्षणाने आत्मनिर्भर स्वयंपूर्ण बनलेल्या मुलींची एक नवी आत्मविश्वासी पिढी या काळात उदयाला आली.
मल्टीप्लेक्सच्या उदयाने या काळात चित्रपट क्षेत्रातही बदल घडून आले. तेच ते टिपिकल विषय असणाऱ्या चित्रपटाव्यतिरिक्त अनेक विविध विषय हाताळणारे दिग्दर्शक पुढे आले . या दिग्दर्शकानी आर्थिक उदारीकरणात अस्तित्वात आलेल्या नवीन मध्यमवर्गीय समाजाच चित्रण करायला सुरुवात केली. या चित्रपटातूनच मग आतापर्यंत दुय्यम भूमिका असण्याऱ्या , बहुतांशवेळा फक्त नायकाच्या प्रेमपात्राची भूमिका बजवण्याऱ्या , हॅपी एंडिंगपुरतं मर्यादित असण्याऱ्या स्त्रीपात्रांची भूमिका बदलली गेली आणि त्यातूनच पिकू , इंग्लिश विंग्लिशसारखे नवमध्यमवर्गीय नायिकाप्रधान सिनेमे येऊ लागले.
पिकू सिनेमातील पिकू या मिलेनियम पिढीच प्रतिनिधित्व करणारी. जाहिरात क्षेत्रात काम करत असताना स्वतःच्या ९० वर्षाच्या वडिलांचा हेकेखोरपणा सांभाळत त्यांच्यावर तितकेच मनस्वी प्रेम करणारी. पिकूच लग्नाच वय झालेय पण म्हणून ती पूर्वाश्रमीच्या नायिकासारख घराण्यावर बोज टाइप मनस्थिती करून राहत नाही. स्वतःच्या लैगिंक जाणीवांची स्पष्ट कल्पना तिला स्वतःला आहे . त्यासाठी तिला समाजाच्या परवानगीची गरज नाही. तिलाही लग्न करायचं आहे पण ते स्वतःच्या अटीवर. रोजच्या अडचणींना सामोरे जात , त्यावर सोपे तोडगे काढत मनःपूत जगायचा प्रयत्न करणारी मनस्वी पिकू भावते ती यामुळेच. तिला आलेला दिवस भरभरुन जगायचा आहे. त्या दिवसाच्या जिंकण्या हरण्याची पर्वा तिला नाही.
पिकू ही मेट्रो शहरातील मुलगी तर बरेली की बर्फी मधील बिट्टी ही tier 3 सारख्या शहराच प्रतिनिधित्व करणारी. स्त्रियांनी कस नाजूकच असलं पाहिजे , त्यांच्या वागण्या बोलण्यात स्त्री संस्कार झळकलेच पाहिजेत ही समाजाची अपेक्षा. मुलगी साधं कशी बसलीये यावरून तिला जोखल जात असताना बिट्टीच्या वागण्या बोलण्यात दिसणारं सो कॉल्ड पुरुषपण तिच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर बोट (?) रोखतं.बिट्टी बिनधास्तपणे सिगारेट ओढते , स्कुटर चालवते, रोजच्या वरपरीक्षेला कंटाळून घरातून पळूनही जाते. पण बिट्टी ठाम आहे ती तिच्या विचारांवर . आपल्याला कोणत्या प्रकारचा जोडीदार हवाय याची स्पष्ट कल्पना तिला आहे आणि तो मिळेपर्यंत थांबायची तयारी. इतरजणी करत आहेत म्हणून कोणाच्याही गळ्यात हार घालायची तिची तयारी नाही. न पटलेल्या विचारांवर प्रश्न विचारायची हिंमत तिच्यात आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वातील हे बिनधास्तपण , वैचारिक ठामपण तिच्याकडे आकर्षित करायला पुरेस आहे.
क्वीनमधली लग्न मोडल्यावर खचून न जाता नव्याने जगायला सुरुवात करणारी राणी सगळ्यांनाच आवडलेली. पण मला स्वतःला आवडली ती बोल्ड आणि बिनधास्त विजयालक्ष्मी. विजयालक्ष्मी उर्फ व्हीजे ही एकल पालक आहे. पॅरिससारख्या शहरात वेट्रेसच काम करून ती स्वतःच्या मुलाला वाढवतेय. एकल पालक असली तरीही तिला स्वतःच्या शरीराच्या गरजा आहेत आणि त्या गरजांचा उच्चार करण्यात , त्यांना पूर्ण करण्यात तिला कोणत्याही प्रकाराचा अपराधगंड वाटत नाही. स्वतःच आयुष्य उत्फुल्लतेने जगत असतानाच निराश झालेल्या राणीला धीर द्यायचं काम ती सहजतेने करतेय. ही खळाळत हसत प्रसन्न असणारी व्हीजे आपल्या आयुष्यातही एक मैत्रीण म्हणून असायला हवी अस मनापासून वाटत राहतं सिनेमा संपताना.
मुली कितीही कर्तृत्ववान शिकल्या बिकल्या असल्या तरीही त्यांनी पहिलं प्राधान्य द्यावं ते स्वतःच्या घरसंसाराला , मुलांबाळांना. अगदी समाजाच्या शिक्षित वरच्या थरातही ही मानसिकता झिरपलेली आहे. दिल धडकने दो मधील आयेशा ह्या विचारसरणीची बळी आहे. स्वतःच्या भावापेक्षा अधिक कर्तृत्ववान असूनही , घरचा व्यवसाय एकहाती सांभाळायची हिंमत असूनही आयेशा लग्न करते कारण लग्नाचं वय झालेलं असत पण ते लग्नही स्वतःच्या मनाविरुद्ध. लग्न झाल असलं तरीही मी काही करून दाखवू शकते हे घरच्यांना पटवून देण्याची तिची धडपड अस्वस्थ करते. चित्रपटात शेवटी आयेशा स्वतःच्या मनासारखं निर्णय घेते खरी पण वास्तवात किती स्त्रियांना असा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आणि हिंमत असते हा वेगळा मुद्दा. आयेशाची गोष्ट करियरच्या आघाडीवर काही करून दाखवण्याची आस बाळगण्याऱ्या पण घराकडे अगदीच दुर्लक्ष करते ही बया असा समाजाने दिलेला गिल्ट बाळगणाऱ्या स्त्रियांचं प्रातिनिधिक चित्रण करते.
इंग्लिश विंग्लिशमधील शशी आपल्या सर्वांच्याच परिचयाची. मध्यमवयीन गृहिणी हा सर्वच्या दृष्टीने दुर्लक्षित विषय. शशीच शिक्षण तितकेसे नाही , फारसं 'एक्सपोझर' नाही . त्यामुळे स्वतःच्या इंग्रजी माध्यमात शिकण्याऱ्या टीनएज मुलांच्या वेगाबरोबर , बाहेरच नियमित एक्सपोझर असण्याऱ्या आधुनिक नवऱ्याबरोबर जुळवून घेताना तिची दमछाक होतेय. घरच्या लोकांचं प्रत्येक गोष्टीसाठी गृहीत धरलं जाणं तिला अवस्थ करतं पण त्याकडे दुर्लक्ष करत ती स्वतःचा छोटेखानी व्यवसाय सांभाळत आहे. ही विजिगिषु वृत्ती तिला पूर्णत: नवीन देशात राहून नवीन काही शिकायला बळ देते आणि त्यातून आलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर घरातील सदस्यांना प्रत्येक सदस्य समान आहे असं ठामपणे सुनावायची हिंमतही देते! रोजच्या जगण्यातील अडथळ्यांवर मात करत , हिंमतीवर जगण्याऱ्या अश्या अनेक शशी आपल्या आजूबाजूला सापडतील. तुम्हारी सुलूमधली सुलू ही अशीच . स्वतःच अस्तित्व शोधायला उत्सुक असणारी . त्यात अडथळे पार करत स्वतःला सिद्ध करणारी..
मसानमधल्या देवी उर्फ रिचा चद्धाने लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्याच घोर पातक केलेलं आहे. त्यामुळे संस्कृती रक्षणाचा ठेका घेतलेल्या समाजातील सो कॉल्ड कावळ्यांना तिला टोचे मारायचं लायसन्सही मिळालेलं आहे. एका बाजूला हे टोचेही सहन करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रियकराचा झालेला मृत्यूही. मात्र एका क्षणी असह्य होऊन देवी हे दडपण झुगारून देते आणि स्वतःच्या प्रगतीला प्राधान्य देते. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही हा विश्वास ठेवून , बंधन झुगारून ती पुढे पाऊल टाकते. नैतिक अनैतिकतेच ओझं पूर्णपणे स्रियांच्या खांद्यावर टाकून संस्कृती राखायला बघण्याऱ्या समाजाला देवीचं हे पाऊल म्हणजे एक सणसणीत चपराकच आहे.
जाता जाता उल्लेख करावासा वाटतो तो मर्दानीमधील शिवानी रॉयचा. पुरुषी वर्चस्व असण्याऱ्या पोलीस क्षेत्रात असून चाईल्ड ट्रॅफिकिंग रोखणारी , त्यातील गुन्हेगारांना एकहाती शासन करणारी बेडर शिवानी रॉय.शारीरिक आणि मानसिक पातळीवर कमालीचा आत्मविश्वास दाखवत स्त्रिया घाबरट असतात या समाजाला छेद देणारी. तसाच आवर्जून उल्लेख करायला हवा तो NH - १० मधील अनुष्का शर्माच्या भूमिकेचा. नवऱ्याच्या मृत्यूनंतर खचून न जाता , स्वतः जखमी झालेली असूनही नवऱ्याच्या मृत्यूचा बदला घेऊन स्त्री पेटून उठली तर ती कुठल्याही थराला जाऊ शकते याचा प्रत्यय देणारी ही भूमिका. त्याचबरोबर समाजाच्या पितृसत्ताक मानसिकतेवर प्रश्न उठवणारीदेखील.. एक हसीना थी मधील उर्मिलाची भूमिकाही अशीच जबरदस्त. प्रियकराने फसवल्यावर त्यापायी तुरुंगाची हवा खावी लागल्यावर उन्मळून रडून न जाता थंड डोक्याने विचार करत प्लॅनिंग करणारी , आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी जिवाच रान करणारी, प्रेमात स्त्रिया क्षमाशील असतात या टिपिकल मानसिकतेला धक्का देणारी , सूडाने पेटून उठणारी आणि तो सूड घेतल्यावरच शांत बसणारी , दुर्गेचा अवतार धारण करणारी सारिका .. नेहमीच्या समजुतींना धक्का द्यायचं काम ह्या नायिका करतात.
ह्या सिनेमांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यातील नायिका परिस्थितीने गांजलेल्या , टिपिकल मुळुमुळु रडण्याऱ्या नाहीत. त्या बऱ्यापैकी सुखवस्तू घरातील असून पैसा राखून आहेत . वेळ आलीच तर बॅकसीटवर न जाता परिस्थितीशी दोन हात करण्याऱ्या आहेत . पण हे दोन हात करणेही आक्रस्ताळेपणासारख नाही. नीट विचार करून , व्यवस्थित भूमिका घेऊन आपलं नाणं त्या चोख बजावत आहेत. मुख्य म्हणजे आधीच्या नायिकाप्रमाणे बाबा वाक्य प्रमाणम न म्हणता हे अस का ? विचारण्याच धाडस त्यांच्यात आहे. घेतलेले निर्णय निभावण्याची क्षमता देखील आहे. परंपरा वगैरेच्या अति नादाला न लागता लवचिकतेने जगणं त्यांनी स्वीकारलं आहे. ह्या नायिका आधीच्या सिनेमाप्रमाणे प्रेमपूर्ण ,
करुणासिंधू नाहीत. त्यांही इतरांप्रमाणेच हाडामासाच्या आणि मोह , मत्सर , राग , लोभ, प्रेम अश्या विकारांनी युक्त आहेत. किंबहुना अश्या असण्यानेच त्यांचं रियल असणं उठून दिसतं.
या स्त्रिया आपल्या रोजच्या जगण्यात दिसण्याऱ्या आहेत. आपल्यासारखेच रोजचे प्रश्न त्यांना पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरही त्या रोजच्या जगण्यात शोधत आहेत. या स्त्रिया जादूची कांडी फिरवून सुपरहिरोसारख अडचणी संपवून टाकत नाहीत. वास्तव जगासारख त्यावर उपाय शोधतात . ही स्त्रीपात्रे जवळची वाटतात ते वैशिष्टयामुळेच. तर या कणखर , मजबूत स्त्रियांची संख्या समाजात आणि पर्यायाने चित्रपटात वाढो हे या महिलादिनाच विशफुल थिंकिंग !

सोमवार, २३ मार्च, २०१५

ये मोह मोह के धागे

" कस पसंत केलत हो तुम्ही एकमेकांना ? " आजी धडधाकट असताना  आमच्या  कौटुंबिक गप्पामध्ये एकदा तरी आजी आजोबांना हा प्रश्न विचारला जायचाच . कारण माझे आजोबा म्हणजे अमिताभ बच्चन आणि आजी जया भादुरी. स्वभावही दोन ध्रुवावरचे .. मग दोघेही गाल्यातल्या  हसायला लागायचे. हसायला कारणही तसच. प्रश्न जसा ठरलेला तस ऊत्तरही ठरलेलं.

"आम्ही पसंत पडलो ते एकमेकांच्या आई बाबांना . तुझ्या आजीला सर्वात प्रथम पाहिल ते लग्नात . तोपर्यत कुठली बायको, कूठला नवरा  आणि कुठल काय. वडील माणस सांग्तील ती पूर्वदिशा . त्यानीच ठरवायच , आम्हाला फ़क्त माळ घालायला ऊभ केल जायच " इति आजोबा.

" आजच्यासारख नव्हत आमच्या वेळेस . देवावर , वडील माणसांवर विश्वास ठेवून पुढच पाऊल टाकायच. संसार निभण हे पूर्णपणे नशिबावर अवलंबून " वयाचे ७६ पावसाळे पाहिलेल्या माझ्या आजीच स्वगत. 

भारतात लग्न फ़क्त दोन माणसांची होत नाहीत. लग्न दोन कुटुंबाची होतात. मानापमानाच्या , देवाण घेवाणीच्या , रुढी परंपरेच्या, प्रतिष्ठेच्या  तगाद्यात ज्यांच लग्न होणार असत अशांना गृहीत धरल जात. आजही या परिस्थितीत फ़ार फ़रक नाही. ऑनर किलिंगच्या बातम्या आजही ऐकू येतात. अरेंज मॅरेजच्या नावाखाली  झालेल्या  लग्नात ते दोन जीव खरेच सुखी आहेत हे फ़ारस मह्त्वाच नसत . शरद कटारिया दिग्दर्शित " दम लगा के हैशा " गोष्ट सांगतो अश्याच एका संसाराची ..

प्रेम प्रकाश तिवारी ( आयुषमान खुराणा ) ऊत्तर प्रदेशातील दहावी नापास , जुन्या कैसेटच दुकान असलेला एक सामान्य युवक. त्याचे रागीट वडिल ( संजय मिश्रा )  त्याच लग्न बीएड केलेल्या संध्या वर्माशी  ( भूमी पेडणेकर) ठरवतात.गोल  गरगरीत असलेल्या संध्याशी लग्न करायला प्रेम अर्थातच नकार देतो. मात्र वडिलांच्या दबावामुळे  किंवा त्याहूनही घरची परिस्थिती सुधारायला त्याला होकार द्यावा लागतो. संध्याच्या बीएडमुळे एक कमावत माणूस घरात येणार असत. लग्नाला होकार दिला तरीही त्याचे आणि संध्याचे सूर जुळत नाहीत. छोट्या मोट्या गोष्टी घटस्फ़ोटापर्यत जातात. मात्र कोर्टाच्या नियमामुळे त्यांना सहा महिने एकत्र राहण भाग पडतं. घुसमटून जगत असतानाच पारंपारिक "दम लगा के हैशा " स्पर्धा जाहीर होते. जगण्याच्या, अस्तिवाच्या , नात टिकवण्याच्या धडपडीतून सुरु होतो प्रेम आणि संध्याचा प्रवास. हा त्यांचा यशस्वी होतो का, एकमेकांना नकोश्या अशी त्यांची परिस्थिती कायम राहते का, त्याम्च्या नात्याच पुढे काय होतं ?, चित्रपटात म्हटल आहे तसे प्रत्येक वेळी जिंकण महत्वाच नसून भाग घेण महत्वाच असत का ?   या सर्वाची ऊत्तर चित्रपटात मिळत जातात.

चित्रपटाचा काळ ९० च्या दशकातला आहे. हा काळ सर्वाथाने भारतीय समाज, अर्थव्यवस्था यातील बदलाचा होता. बदल हा सापे़क्ष असतो. काही जण वाहत्या लाटेत तरतात. तर काही जण वाहून जातात. चित्रपटातील प्रेमच जुन्या कॅसेटच दुकान त्याच वाहण्याच्या मार्गावर आहे. कारण नवा जमाना कॉम्पक्ट डिस्कचा आहे. स्पर्धेत टिकून राहायच तर दुकानात बदल करायला हवेत , त्यासाठी पैसा हवा . अश्या वेळि संध्याशी लग्न हाच ऊपाय आहे. कारण दहावी नापास  , फ़ारशी कमाई नसलेल्या प्रेमपुढे तसाही पर्याय नाही. संध्याची मात्र या प्रवासात घुसमट होते. नवर्याची नसलेली साथ, नावाला असलेला संसार, यात संध्याची मात्र फ़रफ़ट होते.

इंग्लिशमुळे दहावी नापास झालेला, त्यामुळे कुढत असलेला , वडिलांच्या दबावाखाली असलेला प्रेम आयुषमानने छान रंगवला आहे. त्याला आयुष्यात काही एक करायच आहे , इतर मुलांप्रमाणे त्याचीही अशी एक स्वप्न आहेत. त्याच वेळेस स्वतच्या  मर्यादामुळे तो जगावर ऊखडलेला आहे. मित्राला सुंदर बायकॊ मिळाली , त्याला चांगली नोकरी मिळाली  त्याच वेळेस स्वतच्या आयुष्यात मिळालेल दान पाहून मनात असलेली घुसमट पडद्यावर त्याने छान व्यक्त केली आहे.  त्यात कुठेही आक्रस्ताळेपणा जाणवत नाही. संध्या झालेल्या भूमीने काम चोख बजावल आहे. पहिलाच चित्रपट असूनही तिच नवखेपण कुठेही जाणवत नाही. नवर्य़ावर मनापासून प्रेम करणारी, त्याच्या हिडिस फ़िडिस करण्याने, झालेल्या अपमानाने दुखावलेली, वेळ पडताच दोन शब्द सुनावणारी संध्या छान ऊभी केली आहे. या दोघांनाही बाकीच्या कलाकारांनी तितकीच तोलामोलाची साथ दिलेली आहे. संजय शर्माचा पुराणमतवादी बाप विषेश लक्षात राहतो.तलावावरचा प्रेम आणि संध्याचा शांत प्रसंग ऊल्लेखनीय आहे.

९०च्या दशकातल जुन ऊत्तर भारतातल शहर मनु आनंद या छायाचित्रकाराने पड्द्यावर सुरेख चितारल आहे. मला वाटत यात कला दिग्दर्शकाचाही तितकाच वाटा आहे.जुन्या पद्धतीची घर, तिथल वातावरण, गल्ल्या, लोकांच्या सवयी, जुन्या पध्दतीचे फोन,  सार काही चित्रपटात सुंदर रीतीने मांडल आहे. चित्रपटातला नर्म  विनोद ही सुद्धा एक मजेची बाजू. पहिल्या भागाच्या मानाने दुसरा भाग काहीसा संथ वाटतो . मात्र त्याने चित्रपट कंटाळवाणा होत नाही. ’ ये मोह मोह के धागे ’ गाण पडद्यावरही तितकच सुरेख अनुभवायला मिळत. पडद्यावर शांत गल्लीतल्या रस्त्यावर जुन्या बजाजवर जात असलेले प्रेम आणि संध्या त्याच वेळेस मोनालीच्या आवाजातल बॅकग्राऊंडला वाजत असलेल हे गाण खिळवून ठेवत.

चित्रपटाचा शेवट अपेक्षित आहे . मात्र अस असूनही आपल्याला नवीन काही अनुभवल्यासारख वाटत. शरद कटारियाने नेमके संवाद आणि प्रसंगातून कथा फ़ुलवली आहे. दिग्दर्शक म्हणून त्याच हे यशच. चित्रपटाच्या ओघात काही गोष्टी सहज येऊन जातात. कुमार सानूची एन्ट्री त्यापैकीच एक ! कुठलाही प्रसंग ओढून ताणून आणलेला नाही . सहज सुंदर असा चित्रपट  बाहेर पडल्यानंतरही विशेष लक्षात राहतो.

व्यावसायिक गरज म्हणून चित्रपटात शेवट दाखवलेला असला तरीही प्रत्यक्ष आयुष्यात असा शेवट किती जोडप्यांच्या वाटेला येत असेल हा प्रश्न  बाहेर आल्यावर पडला . रुढि परंपरेत अजूनही बंदिस्त असलेल्या भारतीय लग्न चौकटीत असे किती प्रेम आणि संध्या घुसमटत राहत असतील  ! का ते लोक  आजीच्या म्हणण्याप्रमाणे पदरी पडल आणि पवित्र झाल अस मानून चालत असतील कुणास ठाऊक  !       

सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४

वर्गीस कुरियन

वेडेपणा म्हणजे काय ? चारचौघासारख न वागता वेगळ वागण की दिलेल्या परिघाच्या बाहेर जाउन चौकटीबाहेर जाउन वागण ?? आणि या वेडेपणाचा समाजाला फ़ायदा झाला तर ?? मग तो वेडेपणा ठरतो का ?? का समाजाभिमुख काम वेडेपना अंगी असल्याशिवाय करता येत नाहीत ? स्वप्न ही वेडॆपणीच पाहायची असतात का ?? प्रश्न प्रश्न आणि प्रश्न

पण सॅम पित्रोदाच्या शब्दात सांगायचे झाले तर किंचीत वेडेपणा अंगी बाणवल्याशिवाय गोष्टी घडवुन आणल्या जात नाहीत.घडवता येत नाही. कारण त्याशिवाय दुध उत्पादक शेतकर्याच्या सहकारी संस्थामार्फ़त आपल्या देशाला दुध उत्पादनात स्वयपुर्ण बनवण्याचे स्वप्न पाहणारे डॉ वर्गीस कुरीयन वेडे ठरले नसते.

वर्ष १९४८, स्थळ दिल्ली , एके दिवशी सकाळी परदेशी शिक्षण घेउन परतलेला , स्वतवर दांडगा विश्वास असलेल्या काहीसा आगाउ असा एक भारतीय तरुण शिक्षण उपसचिवाना भेटण्यासाथी जातो. तेथे त्याला कळ्त की भारत सरकारच्या स्कॉलरशिप अन्तर्गत त्याची नियुक्ती आणंद या ठीकाणी झाली आहे. मात्र युनियन कार्बाईडच्या कारखान्यात नोकरी करण्याची ईच्छा असल्याने हा तरुण ती ऑफर ठोकारुन लावतो. त्यावर उपसचिव त्या तरुणाचे शिक्षण सरकारी तिजोरीतुन झाले असल्याने त्याला खटला भरायची धमकी देतो. त्या सरकारी खर्चाचा परतावा करण्याची ताकद नसल्याने चरफ़डत तो तरुण आपला मामा नवनिर्वाचित मंत्री जौन मथाई यांच्याकडे सुटकेच्या मार्गाकडे जातो. पण ईथे मात्र वेगळच घड्त. " तुला तुझ्या हिमतीवरच भविष्य उभ करायच होत. मग ते उभारा, मी तुला कोणतीही मदत करणार नाही. " या शब्दात कानउघाडणी केली जाते. मामे आजीनी नोकरी बदलण्याच राहू दे , निदान पगार वाढवायला तरी मदत कर या रदबदलीलाही केराची टोपली दाखवून "त्याला ती मिळणार नाही हेच बघायच माझ कर्तव्य आहे" या शब्दात उत्तर मिळत.सुटकेचे सारे दोर कापले गेलेला हा तरुण नाईलाजाने आण्नदकडे प्रयाण करतो. भारताला दुग्धउत्पादनात स्वंयपुर्ण बनवन्यार्या धवलक्रान्तीच्या जनकाची डॉ वर्गीस कुरियनची सुरुवात अशी होते.

स्वातंत्रपुर्व काळात आणंदमधल्या कैरा ईथे ब्रिटीश सरकारने दुधडेअरी चालू केली होती. ईथेच सरकारी एकाधिकारशाही विरुध सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली १५ दिवसाचा संप झाला होता. स्वातंत्रोत्तर काळात येथे असलेल्या साय उत्पादक केन्द्राचा कार्यभार कुरियनवर सोपवण्यात आला. सक्तीने लादलेल्या या ओझ्यामुळे कुरियन तसा नाराज होता. आणंद मध्ये त्या काळी सुविधांच्या नावाने बोंब होतीच. सरकारी कारभार असल्याने केन्द्रातही सावळागोंधळ होताच. त्यातच कुरियनला राहत्या घरापासुन अडचणीचा सामना करावा ला्गल्याने त्याला फ़ार काळ ईथे राहण्यात रसही नव्हता. त्यामुळे दिल्लीला सतत पत्रे पाठवून करारपत्रातून मुक्ततेचा धोशा त्याने चालूच ठेवला होता. या प्रयत्न्नाना अखेर यश आल आणि यातून सरकारने त्याची मुक्तता केली. जायला निघणार ईतक्यातच त्याची भेट बाजूच्या कैरा सहकारी दुध संघाचे अध्य़क्ष त्रिभुवनदास पटेल यांच्याशी झाली. कुरियनचे बेत समजताच त्यांनी त्याला दोन महिने थांबायाची विनंती केली. शेतकर्याच्या हिताशी अतिशय एकनिष्ठ आणि कमालीची सचोटी , प्रामाणिकपणा अंगी असलेल्या या असाधारण विलक्षण माणसाला नकार देण कुरियनला अवघड गेल. त्रिभुवनजीशी आणि कैरा जिल्ह्यातल्या दुध सहकार तत्वाशी त्याच्या आयुष्यभराच्या मैत्रीची ही मुहुर्तमेढ आहे याची त्याला पुसटशी कल्पना नव्हती.

लवकरच संस्थेच्या कामामधे कुरियन गुंतत गेला. केवळ स्वतकरता नव्हे तर समष्टीच्या कल्याणाकरता काम करायची सुसंधी त्याला दिसली. हे समाधान त्याला परिपुर्णतेचा आनंद देउन गेल. शेवटी केवळ दोन महिन्यासाठी थांबलेला कुरियन १९५० साली कैरा संघाचा सरव्यवस्थापक झाला. भारताच्या धवलक्रांतीची ही नांदी होती.

एकदा झोकून द्यायच ठरवल्यानंतर कुरियनने मागे वळून पाहिल नाही. याकामी त्याला साथ मिळाली ती त्रिभुवनदास पटेल, एम एच दलाया यासारख्याची. त्रिकूट शासन म्हणून लवकरच या तिघांची ख्याती कैरात पसरली. कैरातल्या छोट्यातल्या छोट्या मुद्द्द्यावर कुरियनने ल़क्ष दिले. दुध व्यवसायातले तात्कालिक ईश्यू उदा दुधाची नासाडी, दुध भुकटी, दुधाच्या वितरणातले दोष यावर काम करायला सुरुवात केली. याचा परिनाम म्हनजे १९४८ सालच रोजच २०० लिटर्सच उत्पादन १९५२ साली २०००० लिटर्सपर्यत पोचल. आधुनिक डेआरी चालवण्याकरता योग्य ते कौशल्य मिळाव यासाठी न्युझीलंडला जाउन योग्य ते प्रशि़क्षणही घेतल.

या सर्व धडपडीच रुपांतर ३१ ओक्टोबर १९५५ सालच्या अंमूल डेअरीत झाल. मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त ठरलेल्या म्हशीच्या दुधाच काय करायच हा प्रश्न कुरियनपुढे उरलेला होताच. त्याची भुकटी करता येईल अशी कल्पना त्याच्या मनात आली . व तसा प्रस्ताव त्याने मांडला. मात्र हे काम सोप नव्हत. जगभरातल्या जाणकारांनी म्हशीच्या दुधाची भुकटी होऊ शकत नाही असा निर्वाळा अगोदरच दिला होता. त्यात या प्रस्तावाला विरोध करायला सरकारी अधिकारीही टपलेलेच होते. मात्र कार्यात येण्यार्या अडचणीच प्रगतीला साहायभुत ठरतात यावर कुरीयनची गाढ श्रद्धा होत्ती. त्याने हे आव्हान स्वीकारल आणि म्हशीच्या दुधाच्या भुकटीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला. कुरियनच्या भावी वाटचालीची ही एक झलक होती.

सहकार तत्वावर गाढ विश्वास असण्यार्या कुरियनने हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अमूल डेअरीचा प्रकल्प हाती घेतला. अर्थातच ह्यातही त्याला अनेक अडथळे पार करावे लागेल. सरकारी पातळीवरचा विरोध, त्याहीपे़क्षा आपल्याच माणसाना तुच्छ लेखण्याची, विरोध करण्याची प्रवृत्ती हा सर्वात मोठा अडथळा होता. हे कमी की काय म्हणुन युनिसेफ़बरोबरचा यंत्रसामुग्रीचा वाद, कमी मुदतीत प्रकल्प पुर्ण करायच आव्हान बॉयलरला लागलेली आग ह्या अडचणी होत्याच . मात्र या सार्याचा बाउ न करता कुरीयनने त्यावर धीराने मात केली आणि पुर्णपणे सहकारी तत्वावर चालणारी शेतकर्याच्या मालकीची डेअरी असावी हे सरदार पटेलांच स्वप्न अमूलच्या रुपाने प्रत्यक्षात उतरवल.

या घटनेतुन कुरियनलाही बरच काही शिकायला मिळाल. विकसित देशांमधला "जाणकारांचा" तांत्रिक सल्ला हा विकसनशील देशाच्या गरजा वा प्रत्यक्ष परिस्थितीशी निगडीत नसून त्यांच्या स्वताच्या देशाच्या आर्थिक हितसंबंधाशी जॊडलेला असतो हा धडा त्याला मिळाला. यामुळेच पुढील वाटचालीत बहुराष्ट्रीय कंपन्याबाबत त्याने कडक धोरण स्वीकारल. नेस्लेला परवानगी देतानान्ही अनेक अटी घातल्या. सहकार हाच शेतकर्याच्या पर्यायाने देशाच्या प्रगतीचा पाया आहे यावरची निष्ठा अधिकाअधिक द्रुढ झाली. कोणत्याही विकासाचा केंद्रबिंदू सामान्य माणूसच असायला हवा याचा आग्रह त्याने धरला. तसेच नोकरशाहीशी घडलेला संघर्ष हा पदोपदी करावा लागेल याचीही खुणगाठ त्याने मनाशी बांधली.

केवळ उत्पादन न वाढता त्याचे वितरणही योग्य प्रकारे झाले पाहिजे यावर त्याचा भर राहिला.सहकारी संस्था असली तरीही त्याचे काम अगदी व्यावसायिकरीत्या व्हावे या विचारातुनच अमूलच्या ब्रॅडची जाहिरात करायची योजना आखली गेली. यातुनच अमूल ब्रॅडचा जन्म झाला. पुढे १९६६ साली युस्टास फ़र्नाडिसांनी अमूलच शुभंकर जन्माला घातला. ती छोटी खट्याळ मुलगी. पुढे ती ईतकी प्रसिध झाली की ती आणी अमूल ब्रॅड अस एक समीकरणच बनून गेल.

सामान्य माणूस हा भारतीय प्रगतीचा मुख्य आधार आहे यावर कुरियने नेहमीच भर दिला. यामुळेच केवळ अमूलच्या बॅलन्सशीटचे आकडे फ़ुगवण्यात धन्यता न मानता त्यात सहभागी असण्यार्या या घटकाचीही प्रगती झाली पाहिजे याकडेही त्याने ल़क्ष पुरवले. अमूलमूळे एका नव्या सामाजिक वीणीची सुरुवात झाली. उदाहरणार्थ दुध व्यवसाय हा प्रामुख्याने स्त्रियांच्या हाती होता. या भरभराटीला येण्यार्या उद्योगामुळे स्त्रियांच्या हाती पुरुषाईतकाच पैसा खेळू लागला. त्यांच आर्थिक स्वावलंबन झाल. दुसर म्हणजे अमुलमधे प्रथम येण्यार्स प्राधन्य या तत्वावर दुध संकलन केल जाई. रांग सर्वाना समान होती. जातिसंस्थेसारख्या रुढीचे किमान टवके उडायला यामुळे मदत झाली.तसच स्वच्छतेच महत्व सर्वाना पटवून देण्यात आल. दुध व्यवसायासाठी पशुधन सर्वात महत्वाच असल्याने पशुवैद्याकाची नियुक्तीही करण्यात आली. त्याबरोबरच बायकामुलांकरता "आरोग्याची काळजी कशी घ्यावी" याबाबतचे कार्यक्रम घेण्यासाठी त्रिभुवनदास फ़ौडेंशनचा निर्मिती झाली.

अमूलच्या या प्रगतीशील घौडदौडीमुळे ईतर ठिकाणाहुन काम करण्याबाबत कुरियनना बॊलावण येउ लागल. दिल्ली मिल्क स्कीमच काम हे त्यापैकीच एक. प्रचंड प्रमाणात भ्रष्ट्राचार , गैरव्यवस्थापन , गैरप्रकार याची बजबजपुरी तिथे माजली होती. पण दिल्लीतले दलाल, राजकारणी यांच्या झोटिंगशाहीला न जुमानता ,हितसबधाला धक्का देउन प्रसंगी शत्रुत्व पत्करुन कुरीयननी डीएमएस गदागदा हलवुन सोडली व केवळ ४२ दिवसात घोळ निस्तरुन तिला नव रुप दिल.

१९६५ साली पतप्रधान लालबहादूर शास्त्रीबरोबर झालेली भेट कुरियनच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. आणंदचा प्रकल्प पाहिल्यानंतर देशभर असे आणंद व्हावेत अशी ईच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठीच्या योजनेची संपूर्ण जबाबदारी कुरीयनवर सोपवण्यात आली.या कामासाठी नॅशनल डेअरी डेवलमेण्ट बोर्ड ( एनडीडीबी) स्थापन करण्यालाही मान्यता देण्यात आली. ऑपरेशन फ्लडची ही सुरुवात होती

अर्थात हे काही एवढ सोप नव्हत. त्यासाठी कुरियनना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. आणंद पॅटर्न देशभर रुजावा अशी खुद्द पंतप्रधानांची ईच्छा असली तरीही बहुतेकाना ते आपल्या राज्यात यशस्वी होईल हेच मान्य नव्हते. सर्वात मोठा अडथळा तर नोकरशाहीचा होता ऑपरेशनच फ़्लडच यशस्वी होण हा त्यांच्या आजवरच्या सरकारी खाक्याला धक्का होता. ही योजना प्रत्यक्षात येण हे ही काही हितसबधाना धक्का लावणार होत. मात्र हातात घेतलेले काम तडीस लावण्याच्या स्वभाव असल्याने कुरियननी यातूनही मार्ग काढला. या योजनेच महत्व , फ़ायदे अनेकाना पटवून देत योग्य त्या परवानग्या मिळवत या प्रकल्पाची मुहुर्तमेढ सप्टेबर १९६५ रोवली गेली.

थोडक्यात सांगायचे तर या प्रकल्पाचे तीन टप्पे होते. पहिला ट्प्पा म्हणजे देणगी म्हणुन मिळालेल्या दुग्धजन्य पदार्थापैकी दुधाच्या भुकटीच दुधामधे रुपांतर करुन त्याच वितरण मुंबई , दिल्ली, कलकत्ता मद्रास ईथल्या सरकारी दुध योजनाना करायचे. जेणेकरुन तिथल्या बाजारपेठावर नियंत्रण मिळावता येईल. अपे़क्षेप्रमाणे कुरीयनना ईथेही संघर्ष करावा लागला. सर्वप्रथम वर्ल्ड फ़ूड प्रोग्रमशी दोन हात करावे लागले. तसेच देणगी मदत मिळावताना भारत कॊणाचाही मिंधा राहणार नाही हे कुरीयननी कटाक्षाने पाहिल. योग्य किमतीपेक्षा कमी किमतीत देणगी उत्पादन विकु देणार नाही आणि भारतातल्या दुध व्यवसायाच ख़च्चीकरण होउ देणार नाही हे ही बजावून सांगितल.

योजनेतल्या दुसरा ट्प्पा होता दुधवितरणातून आणी देणगी रुपातल्या पदार्थाच्या विक्रीतून जो काही पैसा मीळेल त्याच्या वापर शहरातल्या जनावरांच्या निगराणीकरता तसच दुध उत्पादन, संकलन , आणि त्यावरच्या प्रक्रियेकरता वापरण्यात येईल असा. दुध प्रकियेच विकेन्द्रीकरण, सहकार प्रणालीवर भक्कम विश्वास, उत्पादक व ग्राहक यांच्याशी थेट संवाद, ग्राहकाला त्याच्या पैशाच योग्य ते समाधान, उत्पादकाला पैसे मिळण्याबरोबरच त्याचा स्वताचा विकास ही टप्प्याची मुख्य वैशिष्ट्ये होती. स्वकीयाच्या विरोधाला मोडुन टाकत, आर्थिक हितसबन्धाना भीक न घालत्ता प्रचंड विश्वासाने या टप्प्यावरही कुरियननी यश मिळवल. हे यश ईतक भव्य होत की ज्या राज्यानी हा प्रकल्प राबवला नव्हता तिथल्या राज्यकर्त्याना जनतेच्या रोषाला सामोरे जाव लागल. या दुसर्या टप्प्यामध्ये दुध संकलन केद्रांचा आकडा १८ वरुन १३६ वर गेला. शिवाय शहर्यातल्या २९० बाजारपेठांनी विक्रीकेंद्र वाढवली. हा टप्पा संपण्याच्या सुमाराला ४.२५ कोटी शेतकर्याची,त्यांच्या सहकारी संस्थाची एक स्वयंपूर्ण यंत्रणा उभी राहिली. दुधाच्या भुकटीत आणि विक्रीतही विक्रमी वाढ झाली.

बाजारांतून प्रमुख दुधयंत्रणेचा बस्तान नीट बसण्यासाठी या सगळ्याच्या वापर हा यंत्रणेच्या तिसरा ट्प्पा. १९८५ ते १९९६ च्या काळात अगोदर अस्तिवात असलेल्या ४२००० सहकारी संस्थामध्ये ३०००० ची भर पडली. मोठ्या प्रमाणावर सभासदाचे प्रशि़क्षण केल गेल. महिला सभासदांची पर्र्यायाने महिला सहकार संस्थाची संख्या वाढली.दुधाच संकलन, व्यवस्थापन, विक्री तसेच जनावरांच्या आरोग्यविषयक सेवा , चाराची सोय , पौष्टिक खाद्य यावर भर देण्यात आला.
जागतिक बँकेच्या अहवालानुसार ऑपरेशन फ्लड मध्ये गुंतवलेल्या २०० कोटी रुपयांवर भारतीय ग्रामीण व्यवस्थेतून दरवर्षी २४००० कोटी रुपये असा मोबदला मिळाला होता. हे ऑपरेशन फ्लडच नेत्रदीपक यश होत.

अशाप्रकारे चार दशक लागलेल्या या ऑपरेशन फ्लडला निश्चित असा आकार आला . ते मार्गी लागल आणि ही धवल पताका जगभर फ़डकली.

चाळीस वर्षाचा कालावधी घेतलेल्या या ऑपरेशनबाबतीत कायम वांदंग झडले. त्यावर सतत चर्चा होत राहिली. प्रसार माध्यामाची , जनतेची यावर कायम नजर राहिली. आश्चर्याची गोष्ट असी की आंतरराष्ट्रीय पातळीवर जरी या प्रकल्पाच कौतुक झाल असल तरी खुद्द देशात मात्र यावर कायम शंका व्यक्त होत राहिली. यातली काही वर्षे तर कुरीयन आणि सहकार्यासाठी सत्वपरीक्षेची ठरली. टाईम्समधून अल्वारिस यांनी लिहीलेली धवल असत्य ही एक मालिका हे याच ठळक उदाहरण. यात धवलक्रांती कशी अयशस्वी ठरली आहे याच लिखाण केल होत.
हे कमी की काय म्हणून ऑपरेशनच्या स्वरुपाला देखील अनेकांचा विरोध होता. देणगी स्वरुपात मिळलेल्या दुध भुकटीमुळे देश कसा आयातप्रधान झाला आहे ही भीती व्यक्त केली गेली. जी अर्थातच अनाठयी व कुरीयनना न ओळखता आल्याच्या मानसिकतेतून केली गेली होती. दुसर महत्वाचा आरोप म्हणजे या प्रकल्पासाठी खेड्यातल पोषणमूल्य युक्त अन्न शहराकडे वळवून खेडुताच्या जीवावर शहरवासियांच पोषण करण अर्थातच या आरोपालाही योग्य त्या आकडेवारीने सप्रमाण दाखवून देउन कुरीयननी खोडून काढल.या ऑपरेशनसाठी वापरल्या जाण्यार्या यंत्रसामुग्रीविषयीसुद्धा वाद झाले. यंत्र आयातीमुळे भारताला परालंबित्व आल असा टीकाकाराचा आक्षेप होता. यंत्र निर्मतीच्या आकडेवारीमुळे हा ही आरोप बिनबुडाचा ठरला.

मात्र या सार्याच्या परिणाम उच्चस्तरावरही झालाच. अनेक हितसबध जोपासता न आल्याने कुरीयनानी अनेकांशी वितुष्ट् घेतल होतच. शेवटी बराच गदारोळ झाल्यानंतर औपरेशन फ़्लडच्या यशाअपयशाच मूल्यमापन करण्यासाठी झा समिती नेमण्यात आली. जिने अर्थातच अनुकूल असा अभिप्राय देउन टीकाकरांची तोंड बंद केली आणि या एकूणच प्रकल्पाबद्द्ल कुरीयन तसेच एनडीडीबीची पाठ थोपाट्ली.

मात्र या सगळ्यामुळे कुरीयन अजिबात विचलीत झाले नाहीत. आगीतून बाहेर पडल्यानंतर हिर्याच तेज आणखी उजाळत त्याप्रमाने कुरीयन आणि प्रकल्पाच झाल. तिसर्या टप्प्यासाठी जागतिक बॅकेन्च सुलभ अर्थ साहाय व त्याही पेक्षा १२ ओक्टोबर १९८७ रोजी एनडीडीबीला कायद्यानुसार मिळालेली स्वायत्ता याने कुरीयन यांच कर्तुत्व आणखी झळाळून निघाल.जगभर या ऑपरेशनची ख्याती पसरल्याने परकीय देशाकडून उदा. रशिया , श्रीलंका, पाकिस्तान यासारख्या देशातुनही हा प्रकल्प राबण्याची विचारणा होउ लागली.
केवळ ऑपरेशन फ़्लड पुरत कुरीयन याच कर्तुत्व सीमीत नाही. अमूल बेबी फ़ुड , धारा खाद्यतेल, ३०००० सहकारी संस्थाची निर्मिती , व्हेन्डीग मशीन्स, मीठगरासांठी केलेले प्रयत्न, ईर्माची स्थापना अशा अनेक कामागिर्या त्यांच्या नावावर नोंदलेल्या आहेत

धवल क्रांतीचे शिल्पकार असण्यार्या डॉ वर्गीस कुरियन यांची ही कहाणी.. मेटर्लजी विषयात करिअर करण्याची ईच्छा असनारे कुरियन नशिबाच्या एकाच कलाटणीमुळे दुध व्यवसायात आले आणि त्यात गुंतत गेले. निस्वार्थी व्रुत्त्तीने केवळ शेतकर्य़ाच्या विचार करण्यार्या या माणसाच आयुष्य म्हणजे विविध रंगाचे मिश्रण आहे. त्यात त्यांची आव्हान , त्यांच यश , त्यांच वैफ़ल्य असे अनेक रंग आहेत.
सहकार तत्वावर गाढा विश्वास असण्यार्या या माणसाने सहकारी तत्वावर व्यावसायिकरीत्या यशस्वीपणे उद्योग चालवता येतात हे दाखवून दिल. डेमोग्राफ़िक डीवीडंडची कल्पना प्रत्यक्षात उतरवली.
खेड्यापाड्यातल्या गरीबाना मिळाण्य़ाकरता निर्जतुक आणि सकस दुधाची निर्मिती, त्याच्या वितरणासाठी उभारलेली साखळी यंत्रणा हे यातले प्रमुख टप्पे. त्यांनी निर्माण केलेला अमूल हा जगातला सर्वात मोठा ब्रंड ठरला. दरडोई दुध उपलब्धतेत झालेली वाढ हे डॉ कुरीयनच आणखी एक कर्तुत्व. विना सहकार नाही उध्दार हे तत्व कुरीयन यांच्या कामाच सुत्र होत.बहुराष्ट्रीय कंपन्याना भारतीय बाजार पेठा आंदण मिळू नयेत याची पूरेपूर काळजी घेतली. त्यानी निर्माण केलेल्या संस्था ह्या भारतीय दुध व्यवसायाचा आधारस्तंभ ठरल्या.गांधी पटेलांच्या सामान्य माणसाची ताकद कुरीयननी ओळखली. त्याना एकत्र आणल. आणि देशाला एका क्षेत्रात स्वंयपूर्णता मिळवून दिली. शेतकर्याच्या नोकरदार असे जन्मभर म्हणवून घेण्य़ात या माणसाने धन्यता मानली

मात्र ही वाटचाल सोपी नव्हती. अनेक अडचणीचा त्यांना सामना करावा लागला. बर्याचदा संघर्ष कारावा लागला. सनदी नोकरशाहांशी तसेच सत्ताधार्याशी उडणारे खटके नेहमीचे होते. या कटू अनुभवामुळे दुध व्यवसायातील शेतकर्याच्या खरा शत्रू हा सरकार आणि अधिकारी आहेत हे त्यांचे मत अखेर पर्यत कायम राहिल.

आपले निर्णय अंमलात आणणयासाठी अनेक कठोर निर्णय त्यांना घ्यावे लागले. थंड काळजाचा, हट्टी, दुराग्रही, वेडा अशा अनेक विशेषणांनी त्यांना हिणवल गेल. मात्र एवढ होउनही न डगमगता योग्य तेच पायंडे पाळण्याबाबत कुरीयन आग्रही राहिले . त्याची गोमटी फ़ळे पुढे मिळाली

भारताचा मिल्कमन म्हणुन गौरवलेल्या डॉ कुरियनना अनेक मानसन्मान मिळाले. मेगसेसे पुरस्कार ( त्रिभुवनदास आणि खुरोंडीसहित संयुक्त ) , वॉटलर पीस प्राईज, डेअरी मॅन ओफ़ द ईयर , मिशिगन युनिवर्सिटीकडुन मिळालेली डॉक्टरेट हे काही वानगी दाखल पुरस्कार. भारतामध्येही त्यांना पद्मश्री, पद्मविभूशण अश्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आल.

या प्रवासात कुरीयनना त्रिभुवनदास पटेल, दलाया . पत्नी मॊली, यशवंतराव चव्हाण , लाल बहादुर शास्त्री , ईन्दिरा गांधी सारखे राजकारणी , शिवरामन , सुबम्रण्यम सारखे सनदी अधिकारी आणि सर्वात मह्त्वाच म्हणजे सामान्य शेतकरी अशा अनेकांची साथ मिळाली . किंबहुना या सर्वाशिवायचा त्यांच्या प्रवास सुखकर ठरला नसता

एकेकाळी वेडा हट्टी म्हणून हिणवल्या गेलेल्या या माणसाच वेडेपण देशासाठी द्रष्ट ठरल. सॅम पित्रोदांनी म्हटल्याप्रमाने या माणसाची स्वप्न वेडी असली तरीही खरी होती. त्याची प्रत्येक गोष्ट पटावी असे नाही पण या माणसाने आपल्याला एक स्वप्न दिल आनि त्या स्वप्नातला वाटा सर्वाना हवा आहे ही वस्तुस्थिती आहे. आपल्या सर्वासाठी ही अशी वेडी माणस अधिकाअधिक प्रमाणात हवी आहेत.

डॉ वर्गीस कुरियन ....
या माणसान नेहमीचा श्रीमंत होण्याचा मार्ग धुडकावला.....
नावही न एकलेल्या आणंदला आपल कार्यक्षेत्र बनवल.....
विदेशी कंपन्याना तोडीस तोड देत अमूलची निर्मिती केली. ....
धवलक्रांतीच्या जनकाचा हा प्रवास अतिशय रोचक , विलक्षण !!!!
मती गुंगवणारा , रंजक , आणि भारतीय मनोव्रुत्तीवर
झगझगीत प्रकाश टाकणाराही !!!



****************************************************************************







































































































































Back to Top

आठवणीतील स्वातंत्रदिन!

 १९४१ साली गावाहून मुंबईत आलो. तेव्हा १५ - १६  वर्षाचा असेन . ग्रांटरोडला नातेवाईक मंडळीकडे राहत होतो . त्यांच्या ओळखीने मिलमध्ये कामास लागल...