विंडो शॉपिंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विंडो शॉपिंग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

आठवणीतील स्वातंत्रदिन!

 १९४१ साली गावाहून मुंबईत आलो. तेव्हा १५ - १६  वर्षाचा असेन . ग्रांटरोडला नातेवाईक मंडळीकडे राहत होतो . त्यांच्या ओळखीने मिलमध्ये कामास लागलो .  वर्ष झालं .नंतर काँग्रेसच्या लोकांचे भाषण ऐकले. ते ऐकून आम्ही मुलांनी नाना चौकात जाऊन भारतमाता की जय बोललो . गांधीबाबा भारी होता . सभेत जाऊन भाषण ऐकायचो . मिलच काम कापसावर चालायचं . मग १९४७ साली इंग्रज निघून गेले . तेव्हा नाना चौकात मोठा जुलूस झाला . सगळीकडे दिवे लागले . पेढे वाटले. मिलच्या जॉबरने सांगितले तुम्हाला सुट्टी . मग आम्ही पोरे फिरायला निघालो. सगळीकडे आनंद होता. लोक खुश होते. काँग्रेसच्या लोकांनी आता आपले राज्य आले असे सांगितले . सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या . भारतमाता की जय म्हटले . नेहरू मंत्री झाला . त्यांच्यानंतर इंदिरा . 

=========================================


माझ्या ९१ वर्षाच्या आजोबांचे नुकतेच निधन झाले. एकदा कौटुंबिक समारंभात विषय निघाला असता त्यांनी या आठवणी सांगितलेल्या . तब्येत बरी होती तेव्हा वयपरत्वे जेवढं त्यांना लक्षात होत त्यांनी सांगितलं . त्यामुळे थोडेसे विस्कळीत आहे . हे सगळं तेव्हा अचंबित होऊन लक्षात राहिलेलं . आजच्या दिवशी हे सगळं इथे सांगावसं वाटलं 😊

गुरुवार, १८ मार्च, २०२१

विंडो शॉपिंग

 घरापासून जवळपास एक मॉल आहे. म्हणजे येण्याऱ्या जाण्याऱ्या रस्त्यावरच आहे. मॉल म्हटलं की दर्शनी भाग महत्वाचा. दर्शनी भागावर नेमकी कपड्याची छान छान दुकानं आहेत. मॉल जेव्हा पहिल्यांदा सुरू झाला तेव्हा मी कॉलेजात होते . दुपारी परतताना त्या कपड्यांच्या दुकानात असलेल्या मॉडेलवर नजर टाकणे हा छंद होता. काही काही ड्रेस खरंच सुंदर असायचे .इतके सुंदर की लगेच घेऊन टाकावेत आणि मिरवावेत असे. पण तेव्हा विद्यार्थीदशेत होते , मिळण्याऱ्या पॉकेटमनीत ड्रेस परवडणारे नव्हतेच आणि मातोश्री भलते लाड पुरवणाऱ्या नव्हत्याच. त्यामुळे विंडो ड्रेसिंगद्वारे नेत्रसुख हा एकच पर्याय होता.

*कट २*
पुढे यथावकाश नोकरी लागली. त्यामार्गे स्वतः ड्रेस विकत घेण्याची पतही आली. आजही त्या मॉलमध्ये ती दुकाने आहेत. दर्शनी भागात छान छान ड्रेस घातलेल्या मॅनेक्वीन आहेत . थोडक्यात मौका भी है और दस्तुर भी . पण आता ड्रेस विकत घ्यायची इच्छा होत नाही. तेव्हा त्या गोष्टीच अप्रूप होत. आजही त्या रस्त्यावरुन जाताना ते सुंदर ड्रेस दिसतात आणि अप्रूप वाटत . पण पुढे जायची इच्छा होत नाही . एखादी गोष्ट अस्पर्श राहावी , ती मिळून तिचं अप्रूपपण संपू नये असं काहीसे फिलिंग येते आणि त्यामुळे पाऊल पुढे टाकलं जात नाही. खूप सारी मेहनत करून एखादी। गोष्ट मिळवावी नि हातात आल्यावर हांतीच्या ! एव्हढ्यासाठी अट्टाहास करत होतो होय अस काहीसं होत.
कदाचित काही गोष्टींची मजा विंडोशॉपिंगमध्येच असावी

आठवणीतील स्वातंत्रदिन!

 १९४१ साली गावाहून मुंबईत आलो. तेव्हा १५ - १६  वर्षाचा असेन . ग्रांटरोडला नातेवाईक मंडळीकडे राहत होतो . त्यांच्या ओळखीने मिलमध्ये कामास लागल...