शनिवार, ११ जुलै, २०२०

व्हायरस / Virus

१७ मे २०१८ च्या सकाळी सलिह नावाचा एक माणूस केरळमधील सरकारी वैद्यकीय रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत दाखल होतो . सुरुवातीला त्याच्यावर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांना तो जापनीज इंफायलिटीसचा प्रकार वाटतो . पण जसजसा दिवस वर चढत जातो तसतसा उपचार करण्याऱ्या न्यूरॉलॉजिस्टना काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो . या रोग्याची लक्षण वर उल्लेख केलेल्या आजारापेक्षा वेगळीच असतात . विशेष म्हणजे १२ दिवसांपूर्वी सलिहाचा भाऊ याच लक्षणांनी बेजार होऊन गेलेला असतो . आणि सलिहाचे बाबा आणि आत्यामध्येही तीच लक्षण दिसू लागतात . हा इतिहास आणि रुग्णांची लक्षणे बघून न्यूरॉलॉजिस्टना संकटाची चाहूल लागते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या होऊन केरळात निपाह व्हायरसने एन्ट्री घेतली आहे यावर शिक्कामोर्तब होतं.


अबिद अली दिग्दर्शक असलेला Virus हा चित्रपट केरळमध्ये उदभवलेल्या निपाह आजाराची , त्या आजारविरुद्ध केरळने दिलेल्या यशस्वी लढ्याची गोष्ट सांगतो . निपाह व्हायरसचा उद्रेक होऊन त्याने जवळपास २१ जणांचा बळी घेतले . त्यात एका नर्सचाही समावेश होता. केरळच्या वैद्यकीय , प्रशासकीय क्षेत्राची कसोटी या आजाराने पाहिली . या सगळ्याच चित्रण समर्थपणे पडद्यावर उतरल आहे. सुरुवातीचा आजार डिटेक्क्ट करण्यात उडालेला गोंधळ , एकदा त्याच स्वरूप कळल्यावर वैद्यकीय यंत्रणेने कसलेली कंबर , त्याला प्रशासनाने दिलेली खंबीर साथ हे सगळं पडद्यावर आपसूक येत राहतं .चित्रपटाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इतक्या गंभीर विषयावर असूनही कुठेही तो कंठळी , प्रचारकी होत नाही वा धडधड पळत नाही . शांतपणे एकेक पैलू उघड करून दाखवतो . सुरुवात होते ती आजार उघड झाल्यावर अजून किती जणांना याची लागण झाली आहे इथून . त्या शोधात येणारे अडथळे , गुंतागुंतीच्या मानवी स्वभावाचे पैलू, प्रसंगांना सामोरे जाण्याची प्रत्येकाची वेगळी क्षमता , प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेली योजना , आजाराची व्याप्ती शोधण हे सगळं एकापाठोपाठ येत जातं. वैद्यकीय क्षेत्रातील अडचणी , साधन सामुग्रीचा अभाव , लालफितीचा कारभार, पणाला लागलेलं मानवी जीवन , आजारातही टिकून असलेला मानवी कदृपणा हे घटक दर्शन देऊन जातात . बहुपेडी भारतीय समाजात संसर्गजन्य आजराला हाताळण , त्या हाताळणीचे होणारे राजकीय , सामाजिक परिणाम , देशाची सुरक्षितता , निसर्गतील मानवी हस्तक्षेप या सर्व मुद्द्यांवर चित्रपट मार्मिक भाष्य करतो. निपाहसारख्या मोठ्या आजाराला तोंड देताना छोट्यातील छोटी कृती किती महत्वाची ठरते , भारतीय राजकारणी , वैद्यकीय व्यावसायिक , सामान्य नागरिक यांची एकजूट शेवटी कशी जिंकते हे या चित्रपटात वारंवार दिसून येतं .


केरळच्या आरोग्यमंत्री के के शैलजा (चित्रपटात यांची भूमिका रेवतीने केलीये ) IAS ऑफिसर श्रीयुत राजन खोब्रागडे ( कलाकार :- tovino thomas ) आणि त्यांच्या पूर्ण टीमची धडपड चित्रपटभर दिसत राहते . संपूर्ण मांडणीचा भर हा नैसर्गिकरित्या घडत असलेल्या घटनावर असल्याने चित्रपट कुठेही कृत्रिम होत नाही. सिनेमात मोठे मोठे टेक्स , विव्हळत राहणं , चित्रविचित्र पार्श्वसंगीत हे कटाक्षाने टाळलं आहे . चित्रपटाच्या संथ गतींचा कंटाळा येऊ शकतो मात्र एका पॉइंटनंतर चित्रपट पकड घेतो . याच श्रेय अर्थातच दिग्दर्शकला, घट्ट बांधलेल्या पटकथेला आणि मल्याळी अभिनेत्यांना . रेवती वगळता सगळे चेहरे मलातरी नवीन होते .पण त्यांचं तुमच्या आमच्यातील असणं / दिसणं यामुळे परक वाटत नाही.

चित्रपटाच्या शेवटी आरोग्यमंत्री केरळ निपाहमुक्त झालाय ही घोषणा करतात आणि त्यानिमित्ताने सुरेख भाषण करतात . ते भाषण मुळातूनच ऐकण्यासारखं आहे . कोणत्याही आजाराला तोंड द्यायला सगळ्यांची साथ कशी महत्वाची आहे , त्याशिवाय हा गाडा चालवणं किती कठीण आहे हे आवर्जून सांगतात .


केरळच्या निपाहमुक्त घोषणेप्रमाणेच लवकरच कोरोनामुक्त जग ही घोषणा जगाला ऐकायला मिळावी ही त्या जगनियंत्याकडे प्रार्थना !!! आमेन !!!

चित्रपट प्राईमवर उपलब्ध आहे .

दिवे

काही महिन्यांपूर्वी एका कॅम्पला गेले होते .इगतपुरीजवळ. भारतातील इतर गावांसारखं एक ते गाव.. अलंग मलंग पर्वताच्या कुशीत अगदी दुपडून बसलेल ..येताना आम्हाला टॉर्च आणा अस सांगितलेल. गावात शहरासारखा उजेड नाही हे माहिती असतं. त्यामुळे तेव्हा काही वाटलं नाही.
पण या गावातील अंधार कल्पनातीत घनदाट होता. इतका की उजेड नावाची गोष्ट फक्त सूर्यास्तपर्यत . हल्ली हल्ली कोणत्यातरी कंपनीच्या सीएसआर फंडामुळे जनरेटरची सोय झालेली . ती ही त्या गावात येण्याऱ्या पर्यटकांपुरती . नाहीतर सगळीकडे अंधारच . त्याच्या परिणाम इतर गोष्टींवरही झालेला. पण जगण्याची उर्मी चिवट असते म्हणून जगत असतात माणसं ..तशी तिथेही लोक जगतात..
दोन मिनिटं जरी लाईट गेली / एसी बंद पडला तर कासावीस होण्याऱ्या जमातीतले आम्ही . तिथला तो डोळ्यात बोट जाईल इतपत अंधार खुपयला लागला . कुठल्याही गोष्टीचा पॉझिटिव्ह दृष्टीकोण बघा या अपरिहार्य मानवी वृत्तीने अरे बघा, अंधेरीला आलो , अंधेरी रातोमे वगैरे जोक्स मारून झाले .. कसे राहतात ना लोक म्हणून हळूहळून देखील झालं . ते तेवढ्यापुरते राहील , पुढे काही होणार नाही हे जाणवत होतच . ते तसच ठेवून परत आलो ..
कोरोनामुळे सक्तीने घरात बसावे लागलेल्या लोकांना उभारी मिळावी म्हणून दिवे लावणार आहेत, हा कोरोनाविरुद्धचा लढा आहे त्याच बरोबर अचानक वीज गेल्याने ट्रीपिंग फेल होईल वगैरे ठीक ! पण ह्या सगळ्या चर्चेचा अंश त्या गावापर्यंत किंवा अश्या अनेक खेड्यापर्यत पोचत असेल का ? जी गोष्ट एकजूट दाखवायची म्हणून डोक्यावर छपर असलेले , ४ भिंतीत सुरक्षित राहणारे ममव लोकं करणार आहेत त्या गोष्टीकडे जगण्याला पर्याय नाही म्हणून अंगवळणी पडून घेतलेले लोक कसे पाहत असतील ? ७० वर्षे सहन करत असलेल्या ह्या अंधार करोनाचा सामना कस करत असतील ? की सगळ्याच सोयरसुतक नसेल ! की करोना म्हणजे काय हे ही माहित नसेल ? कधी त्यांच्याही आयुष्यात सूर्यास्तनंतर दिवे उजळतील का ?
का मग सुरेश भट म्हणतात तस
"उपाशी लोकहो आली दिवाळी राजपुत्रांची |
दिवे जाळून रक्ताचे करा अंधार आनंदी | ' ही अवस्था कायम राहील ?

Cumin lemon cool drink ..







Roast Cumin in pan as your strong / mild flavor . Then pour water . Boil it for 10-15 minutes . Grind it in mixer . Then strain it if you want .

Take a glass . Drop some cube ice or crushed ice . Pour that cumin extract as per your taste . Squeeze
 lemon . Add sugar /Jaggery as per your choice . Then mix with normal salt as well as black salt . Then add water .. Simple ..
Your Cumin lemon cool drink is ready .

This drink is looks alike brownish to yellow based your roasting and addition of water. 

Egg 65 .





I have seen this recipe on Banglar Rannaghor page and tried the same. Believe me its a good starter for party, dinner. It requires less effort and you can have a restaurant starter dish at your home.

Ingredients 
1) 6 Eggs boiled 
2) 1/2 tea spoon red chilli. 
3) 1/2 tea spoon of salt 
4) 1/4 tea spoon chopped garlic 
5) 1/4 tea spoon chopped ginger
6) 1/4 tea spoon chopped curry leaves
7) 1 chopped green chilli
8) 4 tea spoon maida
9) 2 tea spoon bread crumbs
10) 1 egg white 
11) 1/2 tea spoon garam masala
12) Oil

Step 1 : Egg Balls 
Take boiled eggs. make it into 2 parts . Remove yolk. Cut white part of egg in a very small pieces in a bowl. Add red chilli , salt ,garlic , ginger , curry leaves, green chilli, maida , bread crumbs into it. Mix it well. Add egg white and garam masala into mixure. Again mix it well. 
Now make small balls of that mixure. Heat the pan , pour a oil into into. Once it is sufficiently heated, drop those balls into oil. Fry until golden brown. Then keep them on paper towel. 

Step 2 :  Sauce
For that take 2 table spoon of oil. Add 2 cloves of chopped garlic , 3 red dry chilli. Fry it until garlic gets golden.  Then add 8-10 pieces of curry leaves and 8 table spoon of tomato ketchup . Mix it well. Add pinch of salt to taste. 
Now finally add our fried eggs balls into sauce. For garnishing add  1 chopped green chilli and some coriander. 
Our delicious yummy Egg 65 is ready to it 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ही रेसिपी  मी  Banglar Rannaghor  या पेजवर पाहिली होती. पाहुन झाल्यावर सोप प्रकरण वाटल म्हणून म्हटल करून बघूयात. ही रेसिपी  पार्टी / डीनरसाठी एक  उत्तम स्टार्टर आहे. तुलनेने कमी वेळात होणारी तरीही रेस्टॉरंटचा फील देणारी आखूडशींगी बहुगुणी अशी हि रेसिपी ...
सामग्री
१) ६ ऊकडलेली अंडी
२) 1/2 टी स्पून लाल तिखट 
३) 1/2 टी स्पून  मीठ
४) 1/४ टी स्पून बारीक केलेल लसून
५)  1/४ टी स्पून बारीक केलेल आलं
६) 1/४ टी स्पून बारीक केलेला कढी पत्ता
७) 1 बारीक केलेली हिरवी मिरची
८) ४ टी स्पून मैदा
९) ब्रेड क्रम्ब
१०) १ अंड्याचा पिवळा भाग 
११) 1/2 टी स्पून गरम मसाला 
१२ ) तेल 

Step 1 : Egg Balls 

सर्वप्रथम उकडलेली अंडी घेऊन तिचे २ तुक्डे करा. पिवळा भाग काढून  टाका. अंड्याच्या पांढर्या भागाचे अत्यंत छोटे छोटे तुकडे एका भांड्यात करुन घ्या. त्यात लाल तिखट, मीठ,लसून्ण्,आलं , कढी पत्ता, हीरवी मिरची, ब्रेड क्रम्ब, मैदा मिसळा. चांगल मिसळून घ्या. नंतर अंड्याचा पिवळा भाग , गरम मसाला त्या मिश्रणात टाका. पुन्हा चांगल मिसळून घ्या. 
आता त्या मिष्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून  त्यात  ते गोळे सोडा आणि सोनेरी होईपर्यत तळा. सोनेरी झाले की पेपर टॉवेलवर निथळत ठेवा

Step 2 :  Sauce. 
सॉस बनवण्यासाठी २ चमचे तेल पॅनमध्ये गरम करून घ्या. त्यात २ बारीक केलेल्या लसणीच्या पाकळ्या, लाल सुकलेल्या मिरचिचे तुकडे टाका. लसूण सोनेरी होईपर्यत तळा. ८/१० कढीपट्याची पाने  आणि १० चमचे टोमॅटो सॉस मिसळा. किंचित  मीठ टाका आणि चांगल मिसळून घ्या. 
फायनली अंड्याचे गोळे त्या सॉसमध्ये टाका. सजावटीसाठी १ बारीक कापलेली हिरवी मिरची आणि थोडि कोथंबीर वरुन घाला. 
आपली चविष्ट Egg 65  डिश  तयार आहे. 
 




10 minutes Cheese Garlic Breadstick with Tea




Shadow Door with flowers !!!


Four More Mini Paintings !!!

Mini Paintings



आठवणीतील स्वातंत्रदिन!

 १९४१ साली गावाहून मुंबईत आलो. तेव्हा १५ - १६  वर्षाचा असेन . ग्रांटरोडला नातेवाईक मंडळीकडे राहत होतो . त्यांच्या ओळखीने मिलमध्ये कामास लागल...