The world is a rose, smell it, and pass it to your friends.”
गुरुवार, १८ मार्च, २०२१
विंडो शॉपिंग
घरापासून जवळपास एक मॉल आहे. म्हणजे येण्याऱ्या जाण्याऱ्या रस्त्यावरच आहे. मॉल म्हटलं की दर्शनी भाग महत्वाचा. दर्शनी भागावर नेमकी कपड्याची छान छान दुकानं आहेत. मॉल जेव्हा पहिल्यांदा सुरू झाला तेव्हा मी कॉलेजात होते . दुपारी परतताना त्या कपड्यांच्या दुकानात असलेल्या मॉडेलवर नजर टाकणे हा छंद होता. काही काही ड्रेस खरंच सुंदर असायचे .इतके सुंदर की लगेच घेऊन टाकावेत आणि मिरवावेत असे. पण तेव्हा विद्यार्थीदशेत होते , मिळण्याऱ्या पॉकेटमनीत ड्रेस परवडणारे नव्हतेच आणि मातोश्री भलते लाड पुरवणाऱ्या नव्हत्याच. त्यामुळे विंडो ड्रेसिंगद्वारे नेत्रसुख हा एकच पर्याय होता.
सावित्रीबाई फुले
अकाउंटिंगमध्ये Capital Expenditure नावाची संज्ञा आहे. दीर्घ कालीन फायद्यासाठी केला जाणारा खर्च अस त्याच सामान्यकरण करता येईल. नावाप्रमाणेच या खर्चाचे परतावे मिळायला वेळ लागतो.
ओ_वुमनिया
भारतात स्त्रीशिक्षणाचा पायंडा सावित्रीबाई फुलेंनी पाडला आणि वर्षानुवर्षे अंधारात असलेल्या स्त्रीवर्गाला प्रकाशाची वाट दिसली. सुरुवातीला मुली शिकल्या की डोक्यावर बसतील म्हणून खळखळ करण्याऱ्या भारतीय समाजाने हळूहळू मुलींचं शिकणं मान्य केलं. मात्र या शिकलेल्या मुली आपल्याच ताब्यात राहाव्यात , जुन्या काळापासून आलेल्या परंपरा तश्याच चालत राहाव्यात ही मानसिकता कायम होतीच. त्यामुळे मुली कितीही शिकलेल्या असोत त्यांना घरकाम , स्वयंपाकपाणी आलंच पाहिजे हे कटाक्षाने बघितलं जायच. साधारणपणे बँक , शाळेत नोकरी त्यांनतर वयाच्या पंचविशीपर्यत लग्न , त्यानंतर मुलं अशी व्यवस्था ९०च्या दशकापर्यत कायम होती. थोडक्यात स्त्रियांची भूमिका नेहमीच दुय्यम असणारी. समाजाच्या या मानसिकतेच प्रतिबिंब भारतीय जनमानसावर प्रभाव पाडण्याऱ्या चित्रपट या माध्यमात न पडत तरच नवल. हिंदी / मराठी चित्रपटातील त्या काळच्या नायिका म्हणजे नायकाच्या प्रेमप्रकरणाची गरज भागवण्याऱ्या , पटकथेत चिमूटभर सजवण्यापूरत रोल असण्याऱ्या आणि तो रोलही प्रामुख्याने टिपिकल शामळू मुलींचाच. या मुली जास्तीत जास्त एमए शिकलेल्या असत. त्या खानदान की इज्जत वगैरे मानत, वडीलधार्यांनी ठरवलेल्या स्थळाशी लग्नगाठ बांधण्याऱ्या , त्यासाठी आपल्या प्रेमाला तिलांजली देण्याऱ्या ,लग्नापूर्वी शारीरिक संबंध म्हणजे रौरवनरकाच पाप , नवरा म्हणजे सर्वस्व , लग्नानंतर मुलंबाळात रमण्याऱ्या , सगळं सांभाळून असण्याऱ्या, प्रेमस्वरूप , मातृस्वरूप , वात्सल्यपूर्ण अश्या स्वरूपात असत. त्यांच्या चित्रपटातील अस्तित्वाला तसाही अर्थ चटणीसारखा . तोंडी लावायला.
शनिवार, ११ जुलै, २०२०
व्हायरस / Virus
१७ मे २०१८ च्या सकाळी सलिह नावाचा एक माणूस केरळमधील सरकारी वैद्यकीय रुग्णालयात अत्यवस्थ अवस्थेत दाखल होतो . सुरुवातीला त्याच्यावर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांना तो जापनीज इंफायलिटीसचा प्रकार वाटतो . पण जसजसा दिवस वर चढत जातो तसतसा उपचार करण्याऱ्या न्यूरॉलॉजिस्टना काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो . या रोग्याची लक्षण वर उल्लेख केलेल्या आजारापेक्षा वेगळीच असतात . विशेष म्हणजे १२ दिवसांपूर्वी सलिहाचा भाऊ याच लक्षणांनी बेजार होऊन गेलेला असतो . आणि सलिहाचे बाबा आणि आत्यामध्येही तीच लक्षण दिसू लागतात . हा इतिहास आणि रुग्णांची लक्षणे बघून न्यूरॉलॉजिस्टना संकटाची चाहूल लागते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या होऊन केरळात निपाह व्हायरसने एन्ट्री घेतली आहे यावर शिक्कामोर्तब होतं.
अबिद अली दिग्दर्शक असलेला Virus हा चित्रपट केरळमध्ये उदभवलेल्या निपाह आजाराची , त्या आजारविरुद्ध केरळने दिलेल्या यशस्वी लढ्याची गोष्ट सांगतो . निपाह व्हायरसचा उद्रेक होऊन त्याने जवळपास २१ जणांचा बळी घेतले . त्यात एका नर्सचाही समावेश होता. केरळच्या वैद्यकीय , प्रशासकीय क्षेत्राची कसोटी या आजाराने पाहिली . या सगळ्याच चित्रण समर्थपणे पडद्यावर उतरल आहे. सुरुवातीचा आजार डिटेक्क्ट करण्यात उडालेला गोंधळ , एकदा त्याच स्वरूप कळल्यावर वैद्यकीय यंत्रणेने कसलेली कंबर , त्याला प्रशासनाने दिलेली खंबीर साथ हे सगळं पडद्यावर आपसूक येत राहतं .चित्रपटाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इतक्या गंभीर विषयावर असूनही कुठेही तो कंठळी , प्रचारकी होत नाही वा धडधड पळत नाही . शांतपणे एकेक पैलू उघड करून दाखवतो . सुरुवात होते ती आजार उघड झाल्यावर अजून किती जणांना याची लागण झाली आहे इथून . त्या शोधात येणारे अडथळे , गुंतागुंतीच्या मानवी स्वभावाचे पैलू, प्रसंगांना सामोरे जाण्याची प्रत्येकाची वेगळी क्षमता , प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेली योजना , आजाराची व्याप्ती शोधण हे सगळं एकापाठोपाठ येत जातं. वैद्यकीय क्षेत्रातील अडचणी , साधन सामुग्रीचा अभाव , लालफितीचा कारभार, पणाला लागलेलं मानवी जीवन , आजारातही टिकून असलेला मानवी कदृपणा हे घटक दर्शन देऊन जातात . बहुपेडी भारतीय समाजात संसर्गजन्य आजराला हाताळण , त्या हाताळणीचे होणारे राजकीय , सामाजिक परिणाम , देशाची सुरक्षितता , निसर्गतील मानवी हस्तक्षेप या सर्व मुद्द्यांवर चित्रपट मार्मिक भाष्य करतो. निपाहसारख्या मोठ्या आजाराला तोंड देताना छोट्यातील छोटी कृती किती महत्वाची ठरते , भारतीय राजकारणी , वैद्यकीय व्यावसायिक , सामान्य नागरिक यांची एकजूट शेवटी कशी जिंकते हे या चित्रपटात वारंवार दिसून येतं .
चित्रपटाच्या शेवटी आरोग्यमंत्री केरळ निपाहमुक्त झालाय ही घोषणा करतात आणि त्यानिमित्ताने सुरेख भाषण करतात . ते भाषण मुळातूनच ऐकण्यासारखं आहे . कोणत्याही आजाराला तोंड द्यायला सगळ्यांची साथ कशी महत्वाची आहे , त्याशिवाय हा गाडा चालवणं किती कठीण आहे हे आवर्जून सांगतात .
केरळच्या निपाहमुक्त घोषणेप्रमाणेच लवकरच कोरोनामुक्त जग ही घोषणा जगाला ऐकायला मिळावी ही त्या जगनियंत्याकडे प्रार्थना !!! आमेन !!!
दिवे
"उपाशी लोकहो आली दिवाळी राजपुत्रांची |
दिवे जाळून रक्ताचे करा अंधार आनंदी | ' ही अवस्था कायम राहील ?
Cumin lemon cool drink ..
Take a glass . Drop some cube ice or crushed ice . Pour that cumin extract as per your taste . Squeeze lemon . Add sugar /Jaggery as per your choice . Then mix with normal salt as well as black salt . Then add water .. Simple ..
Your Cumin lemon cool drink is ready .
This drink is looks alike brownish to yellow based your roasting and addition of water.
आठवणीतील स्वातंत्रदिन!
१९४१ साली गावाहून मुंबईत आलो. तेव्हा १५ - १६ वर्षाचा असेन . ग्रांटरोडला नातेवाईक मंडळीकडे राहत होतो . त्यांच्या ओळखीने मिलमध्ये कामास लागल...
-
तर लहानपणापासून चहा हवाच असं काही ठरलेलं नव्हतं आणि ठरलेलं नसल्याने काही एक अडायचं नाही . मुळातच लहान मुलांना चहा मिळायचाच नाही . दूध पिणं...
-
आणि मग एके क्षणी मेंदूने तसेच डोळ्यांनीही शिणवटा आल्याचा निर्वाणीचा इशारा द्यावा . स्क्रीनवरच्या घड्याळ्याकडे पाहून चॅक आवाज काढत आवाराआवर ...
-
तर मग झाल अस की फणस घरी आणवून, अस्मादिकाना टुकटुक करून, घरच्या मेंब्र गरे खाऊन मोकळी झाली . उरल्या त्या आठळ्या! आंब्यांच्या कोयीप्रमाणे त्य...

