शुक्रवार, २ जुलै, २०२१

इरफान !!!

 नेटफ्लिक्सवर तलवार चित्रपट (पुन्हा एकदा) बघत होते. चित्रपटाबद्दल प्रश्नच नाही . मूळ घटना हीच एक "सक्सेसफुल (?) " आडातील गूढकथा असल्याने पोहऱ्यातील चित्रपटदेखील जमलाच आहे.

पण चित्रपटात खरी गंमत आणतो तो इरफान आणि त्याच्या जोडीला प्रकाश बेलवाडी.
शेवटच्या २० मिनिटात या केसच नक्की कोर्टात कस सादरीकरण करायच यावर तपास अधिकाऱ्यांमध्ये चर्चा चालू असते. ही चर्चा एकाचवेळी चुरचुरीत संवादानी हसू आणणारी , तपास यंत्रणेच्या एकंदरीत कार्यशैलीवर बोट ठेवणारी आहे. या पूर्ण चर्चेत इरफान आणि प्रकाश धमाल आणतात . ऑफिसर दीक्षित आणि वेदांत शर्मा ठोकळेबाज पद्धतीनं विचार करत एकाहून एक पुरावे सादर करत असताना चिमटे घेत व्यंगात्मकरित्या खिल्ली उडवायच इरफान आणि प्रकाशच टायमिंग अफलातून आहे. त्यामुळेच इतक्या गंभीर विषयावर चर्चा होत असताना हसू येत आणि या जोडगोळीचे मुद्दे पटू लागतात. विशेषतः "अश्लील साहित्य , धर्मप्रचारक अवस्था या मुद्द्यावर दोघांनी दीक्षित आणि टीमला काढलेले चिमटे चांगलेच बोचरे आहेत . ह्यात संवाद लेखकाचं कौशल्य आहेच पण पडद्यावर ते अगदी सिंक्रोनायइज पद्धतीनं साजरं करण्याऱ्या इरफान, प्रकाशचही आहे. खून करताना वापरलेल हत्यार , टाइपोग्राफीकल एरर , ४ वेळा बदललेल रिपोर्ट या मुद्द्यांवर जेव्हा इरफान भाष्य करतो तेव्हा न राहवून मेंटलिस्टमधल्या सायमन बेकरची आठवण होते. तीच बोचरी शैली , कधी न राहवून उसळून येणं , नेमके प्रश्न विचारून समोरच्याला अडचणीत आणण सगळं काही तेच.
इरफान , तू अजून जगायला हवं होतंस !! खूप काही करू शकला असतास . पण शेवटी चित्रपटात तू म्हटलेले "वो अफसना जिसे अंजामतक लाना न हो मुमकिन , उसे एक खूबसुरत मोड देकर छोड देना ही अच्छा " हे साहिरचे शब्दच खरे आहेत आता !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फणसाच्या आठळ्याची भाजी

 तर मग झाल अस की फणस घरी आणवून, अस्मादिकाना टुकटुक करून, घरच्या मेंब्र गरे खाऊन मोकळी झाली . उरल्या त्या आठळ्या! आंब्यांच्या कोयीप्रमाणे त्य...