मंगळवार, २३ मार्च, २०२१

Neerdosa \ Ghavane\घावणे

तुला स्वयंपाकामधलं काय येतं अस कोणी मला विचारलं तर मला घावणे उत्तम जमतात अस उत्तर मिळतं. घावणे ही कोकणातील स्पेशालिटी . तांदूळ भिजवून , वाटून बिडाच्या / निर्लेप तव्यावर घावणे घालणं हे सुख.. त्यामुळे जेव्हा केव्हा पॉटलक इव्हेंट असतो तेव्हा न बिघडणारी , दगा न देणारी ही भरवश्याची म्हैस नेहमी तयार असते . याचे फायदे असे की i have made authentic cuisine of Konkan अस मिरवता येतं आणि भाव खाता येतो. 

If I am asked, what is your specialty in kitchen, then instant answer is Ghavane a.k.a Neerdosa. Ghavane a.k.a Neerdosa is konkan regional cuisine. . Recipe is simple. Soak  rice overnight, then grind, add some salt and spread the same on nirlep pad or bhidacha tawa. This is easy recipe and in which never failed by God's grace. 

So here presenting my  Neerdosa \ Ghavane\घावणे. Hope you like it 




जलरंगातील बुकमार्क्स ! / Bookmarks in Watercolor

 २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिवस म्हणून ओळखला जातो. यावर्षी लॉकडाऊनमुळे वेळ होता आणि साहित्यही हाताशी होतं . त्यानिमित्ताने हॅन्डमेड कागदावर हे जलरंगातील बुकमार्क्स तयार केले होते. तेच आता इथे टाकतेय.कसे वाटले ते नक्की सांगा .

World Book and Copyright Day is a celebration to promote the enjoyment of books and reading. Each year, on 23 April, celebrations take place all over the world to recognize the scope of books. Lock down had given opportunity of time plus i had material. So I prepared these bookmarks on handmade paper. Tell me how do you find it !



Macaw Painting

 My Macaw Painting 




Ganesh Painting / श्रीगणेशाचे चित्र

                                                          | |प्रथम तुला वंदितो कृपाळा ,गजानना गणराया ||

मी काढलेले जलरंगातील हे श्रीगणेशाचे चित्र . 




                                                          ||श्री गणेशाय नम: || 

My Ganesh Painting in Watercolor. I got 2nd prize in Maayboli.com Painting Competition .

जलरंगात काढलेले श्रीगणेशाचे चित्र.. मायबोली गणेशोत्सव २०२० चित्रकला स्पर्धेत ह्या चित्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे.




 When life gives you lemons, make lemonade .

Likewise when friend gives you empty "Black Label " , make Bottle art
Tried bottle art first time . Turned out done it well .My Friend is happy .
P.S. = I am teetotaler purely.

Before After









Decoupage

Royal Challenge whisky turned into Decoupage !

Decoupage or découpage is the art of decorating an object by gluing colored paper cutouts onto it in combination with special paint effects, gold leaf and other decorative elements .
P.S. = I am teetotaler. Just adding creative touch to this empty bottle given by my friend.





सोमवार, २२ मार्च, २०२१

नवरात्र

 नवरात्रीच्या विशेष अश्या आठवणी म्हटल्या की आठवतं ते गरबा , बाजारातील धांदल , मामांचे उपवास, जोडून येण्याऱ्या सहामाही परीक्षा, त्यासाठी करावा लागणारा अभ्यास त्यानंतरच्या दिवाळी सुट्टीच आकर्षण . पण जरा स्मृतीला ताण दिला की अजून आठवतात ती फूल (हेच आडनाव होतं) आणि आनंद ही आडनावं असणारी पंजाबी कुटुंब.

अस्सल धडधाकट आणि पंजाबी कुटुंब ! पैकी आनंदज मधला राहुल हा अत्यंत मस्तीखोर म्हणून पूर्ण कॉलॉनीत प्रसिद्ध . इतका आडदांड नी टिपिकल पंजाबी कुटुंबातील. दर दोन दिवसाआड शाळेत त्याच कोणाशी तरी भांडण असायचच. मग त्या मुलांच्या आईन राहुलच्या आईकडे तक्रार करणं , मग राहुलच्या आईने राहुलची वरात शाळा ते सोसायटी अशी काढणं ठरलेलं असायचं. 'राहुलने फिरसे आज कुछ किया लगता है ' बडबडत म्हातारी जिजी बाल्कनित बसलेली दिसायची. दोन्ही आनंद अंकल मात्र कधी भानगडीत पडताना दिसले नाहीत. मुलांना वाढवणे हे बायकांचे काम ही त्यांची समजूत . खरंतर दोन्ही आनंद आंटीज एकमेकींच्या बहिणीच होत्या सख्ख्या. गोऱ्यापान , काश्मिरी सफरचंदासारखी रसदार त्वचा. एकाच घरात दिलेल्या. पण अस असलं तरीही रोजची भांडण काही चुकायची नाहीत त्यांची. बहिणीपेक्षा जावा जावा हे नातं वरचढ ठरत असायचं .. भांडण झाले की थोड्या वेळाने सगळं आलबेल . या नात्यामुळे राहुल आणि पूनमला( त्याची चुलत बहीण /मावशीची मुलगी) आम्ही मुलं तुम्ही तुमच्या आयांना माँसी बोलावता की चाची म्हणून चिडवायचो. याउलट फूल अंकल आणि आंटी शांत स्वभावचे होते. मुलगा अमेरिकेत असल्याने इतरांशी जेवढ्यास तेवढे संबंध !!!
नवरात्रात मात्र आम्हाला विशेषतः मुलींना या दोन्ही कुटुंबाकडून एकदम राजेशाही ट्रीटमेंट ! याच कारण माताजींच दोन्ही कुटुंब एकदम भक्तिभावपूर्वक करायची. उधळलेल्या खोंडागत वागणारा राहुलही यावेळी एकदम शांत असायचा. साधारणपणे नवरात्रीच्या पाचव्या , अष्टमी , नवमीला आम्हा मुलींना स्पेशल आमंत्रण ! सकाळी एक १० च्या सुमारास मुलींच्या आयांना विचारून बोलवून घेतलं जायच. ६०च्या जिजी आणि दोन्ही आंटीज जातीने आमचे पाय वगैरे धुवून स्वच्छ करायच्या. मग माताजींका टिका लावायचा. प्रत्येकीला गुलाबाची फुल द्यायची ! देवीप्रमाणे पूजा करून ओवाळून घ्यायचं आणि आमच्या पाया पडायचं. खरी गंमत पुढे.. प्रत्येकीला हेअरक्लिप , नेलपेंट , पैसे ( प्रत्येकी ५ रुपये) , रुमाल, चुनरी अस काही ना काही मिळायचं. त्यावेळी पॉकेटमनी नामक हा प्रकार नव्हता. त्यामुळे ते मिळालेले आखे ५ रुपये मी माझ्याकडेच ठेंवणारे अस मी जाहीर करूनच यायचे. वर्षातून एकदाच हे सगळं असल्याने मातेची पण काही आडकाठी नसायची. हेअर क्लिप वगैरे मधून खास पंजाबी चॉईस दिसायची. सगळं एकदम चमचमीत आणि भडक. मला अजून आठवतं नवीन लग्न होऊन माझी मावशी आमच्याकडे आलेली . तेव्हा तिने टिपिकल ममव पद्धतीने मोजकेच दागिने आणि हलका मेकअप केलेला. दरवाज्यावरच फूल अंकल भेटले. त्यांनी तिला " बिटीया , नई नई शादी हुयी है तो कुछ अच्छे कपडे पहानो करो, दुलहन जैसी लगने चाहीये " असा सल्ला दिलेला. ते आठवून आम्ही आजही असतो. तर ते देवीचं सगळं अस भेटवस्तू मिळणं पंजाबी स्टाईलच. दुसऱ्या दिवशी शाळेत घेऊन गेलो की दोन दिवस त्यावर चर्चा ठरलेली. या भेटवस्तूबरोबरच खास पंजाबी पद्धतीचा भरपूर तूप निथळत असलेला गव्हाचा शिरा, त्यासोबत पुऱ्या आणि चण्यांची भाजी. या खाण्यात वगैरे मला इंटरेस्ट कमी असल्याने मी ते सरळ आईला नेऊन द्यायचं काम करायचे. तर 'मोठं' होईपर्यत हे सगळं अनुभवलं . त्यादिवसात पाया पडून घेणं, पूजा करवून घेणे हा आपला हक्क आहे असेच वाटायचं. बंधूरायांना या दिवसात फिलिंग जेलसी यायचं ते भांडण होईपर्यंत टिकायचे. कारण त्यांच्या हाती भोपळाच ..
सोसायटीच्या टॉवरपूर्व काळात ही दोन्ही कुटुंब भाईंदरवगैरे भागात राहायला गेली. तिथून पुढे काहीच संपर्क राहिला नाही. सगळे मोठे झाले . पूनमकी शादी हो गयी ( तिचं ते स्वप्न होतं) , फूल अंकल ह्या जगात नाहीत इतकंच कळलं. नवरात्र म्हटली की आठवतं ते इतकंच !!!

वाट

 चिडचिड सहन करणारी आई

थकलेल्या खांद्याला उभारी देणारे बाबा
दुधात आवडीची साय घालणारी आजी
वाढलेल्या ताटात हळूच माशाची तुकडी सरकवणारे आजोबा
धडपडून खर्चटन निघालं तर हात देणारे मैत्र
हळूहळू अदृश्य होत जातात
आपल्याही नकळतपणे !!!
अलगदपणे हात सोडवून घेत
आता आमची वेळ झाली म्हणत
पुढे काही बोलण्याची संधी न देता
सहजपणे निघून जातात
सैरभर, पंख तुटलेले आपण
शोधत राहतो तो आधार ,
ते हात इथे तिथे
खिडकीत वाट पाहून पाठीस आलेली रग
मग तशीच घुमसत राहते
डोळे कोरडे , वेळ कोरडी
समोरची कोरडी वाट मग कायमचीच....

जनरलायझेशन / गृहीतक

 जनरलायझेशन / गृहीतक हा लोकांच्या जगण्याच्या एक भाग आहे असं कधी मधी वाटू जातं. आता ह्यात लोकांच्या बिनडोक असण्याच्या भाग किती , डोक्यात घुसलेल्या किंवा घुसडवलेल्या पूर्वग्रहदूषिताचा भाग किती हे नीटस माहीत नाही. X गोष्ट अशी आहे मग त्या अनुषंगाने Y गोष्ट पण तशीच असणार ही गृहीतक बघून मजा येते कधी मधी.

म्हणजे आता बघा खूप शिकलेल्या मुलीना ( शिकलेली मुलगी हे मुळात पाssप , त्यातून जरा जादा शिकलेली म्हणजे महापाप ) स्वयंपाक पाणी जमणारे नाही हे जनरलायझेशन / गृहीतक .त्यांनी मग स्वयंपाकघरात पाऊल ठेवताच (इथे आश्चर्ययुक्त इथे कुठे वाट चुकली भाव असलेल्या नजरा प्रथम झेलाव्या लागतात) patronizing करत न मागता दिलेल्या सल्लाची चवड सुरू. मग आता पाऊल ठेवलच आहे तर मग तिला काहीही येत नाही हे गृहीत धरून अत्यन्त बेसिकपणाची बडबड. अर्थातच त्या मुलीने ही बडबड शांतपणे ऐकून घ्यायची असते. मग पाळी येते ती हात धरून शिकवण्याची. एवढ्यातच मग बालिश सल्ले ऐकून मुलीचा प्रेशर कूकरचा व्हॉल्व्ह वाफ मोकळ होण्यासाठी धडपडत असतो पण तरीही डोकं शांत ठेवून हो हो करत राहायचं. पण मग थोडं तडकायला होतेच आणि मग त्या गरम वाफेचा चटका सल्लेकरी मंडळींना बसतो.तेव्हा मग ठीक है बाई , तुझं तू बघ म्हणत अंग झटकले जातं आणि सुटका होते पण ती तात्पुरती . कारण फायनल प्रॉडक्टच ऑडिट बाकी असतं.(त्यात फजिती होणारच आहे हे गृहीत धरून टोमणे सल्ले तयार असतात) .
एकदाच फायनल प्रॉडक्ट तयार झालं आणि ते मग आपल्यापेक्षाही सरस आहे हे लक्षात येताच अश्या सल्लेकरी मंडळींचा धीर खचू लागतो. पण मग नाक पडलेय हे मान्य तरी कसे करायचे!!! "होय ग , जमलं की तुला. थोडं फक्त अस हवं होतं पण जमेल पुढे " करत सारवासारव होते. पुढे मग " शिकलेय म्हणजे अगदीच काही ही नाही ह " असा आहेर मिळतो.
हीच ती वेळ असते बोलती बंद करायची. ही संधी सोडायची नाही. मग फायनल नेल इन द कॉफीनसाठी अजून एक खिळा ठोकायचा "काकू आता मी स्वयंपाक केला , आता ना तुम्ही माझी बॅलन्सशीट , लीगल document तयार करून द्या, दमले की बाई मी, जमेल ना तुम्हाला ? मी शिकवते की . चला नवीन काहीतरी शिकू आज " हे अत्यंत लाडिकपणाने म्हणायचं.. हे ऐकताच काकूंच्या चेहऱ्यावर वाजले की बारा हे भाव आणि मुलींच्या चेहऱ्यावर तेंडुलकरने त्या झिम्बाबेच्या खेळाडूला एकापाठोपाठ मारलेल्या सिक्सरचे भाव !!! प्रचंड आत्मिक समाधान म्हणजे काय असतं तो अनुभव येतो अश्यावेळी . बाजी पालटू लागलेली असते. काकूंच्या डोक्यात, चेहऱ्यावर कुठून हिच्या नादी लागलो हे भाव .. हॅ हॅ हॅ करत चला पानं वाढू करत काकू अचानकपणे दिसेनाश्या होतात.

कुलक्की सरबत / kulukki Sarbath

 शरीरातील उष्णतेवर सब्जा हा रामबाण उपाय आहे. विशेषतः उन्हाळ्यात तलखीने जीव हैराण होत असताना सब्जा घालून पाणी प्यायलं की गार वाटतं.

केरळमध्ये सब्जा घालून कुलक्की सरबत ( kulukki Sarbath ) करतात. तिथलं हे लोकप्रिय पेय आहे. कुलक्की सरबत हे एक प्रकारचं shaken lemonade म्हणता येईल. मल्याळममध्ये कुलक्की या शब्दाचा अर्थ घुसळणे असा होतो. त्यावरून या पेयाला कुलक्की हे नाव पडलं. हे सरबत तयार करताना जितकं जोरात घुसळल / वर खाली हलवलं जाईल तितकी याची चव खुलते. ह्या पेयाच secret ingredient म्हणाल तर तेच आहे.


लागणारे जिन्नस: 

२चमचे सब्जा ,
एक ग्लास थंड पाणी जितकं सोसेल तितके,
१ लिंबू ,
१ हिरवी मिरची (ऊभी चिरलेली ) ,
बर्फाचे तुकडे ,
चवीनुसार मीठ , साखर , पुदीना


कृती : 2 चमचे सब्जा पाण्यात भिजवत ठेवा. सब्जा भिजेपर्यत एका ग्लासात लिंबाचा एक स्लाइस , एक उभी चिरलेली मिरची , पुदिना, चवीनुसार मीठ, साखर टाका. ह्यात आल्याचे बारीक तुकडे पण घालू शकता (ऑप्शनल). त्यानंतर त्यात लिंबाचा रस घाला. बर्फाचे तुकडे टाका.

ह्यावेळेपर्यत सब्जा पुरेसा भिजलेला असेल. तो ही या मिश्रणात टाकून मिश्रण हलकेसे हलवून घ्या. आता ग्लासात दोन बोट राहतील इथपर्यंतच पाणी ओता. लक्षात घ्या ग्लास पूर्णपणे भरायचा नाही . नाहीतर घुसळताना पाणी बाहेर पडेल. आता दुसरा एक ग्लास घेऊन तो मिश्रणाच्या ग्लासावर ठेवून अर्धा मिनिटं वर खाली चांगलं हलवून घ्या.पण जरा दमान कारण जोरात घुसळताना पाणी बाहेर पडायचे १०० % चान्सेस असतात. तुमच्याकडे Shaker असेल तर हे काम अगदी सोपं होतं.

तर आपलं साधं सोपं आंबटसर , गोडूस, तिखट अशी मिक्स चव असलेलं कुलुक्की सरबत तयार आहे. हे सरबत थंडगार प्यायला छान वाटत. हवं असल्यास थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून नंतर पिऊ शकता.

हे मी केलेलं कुलक्की सरबत / kulukki sarbat






गुरुवार, १८ मार्च, २०२१

Merry Christmas from Little Husky!!!

 Merry Christmas from Little Husky!!!

Rose Vase Painting

 The world is a rose, smell it, and pass it to your friends.”

– Persian Proverb
Hence I painted roses and passing it you my dear friends..




विंडो शॉपिंग

 घरापासून जवळपास एक मॉल आहे. म्हणजे येण्याऱ्या जाण्याऱ्या रस्त्यावरच आहे. मॉल म्हटलं की दर्शनी भाग महत्वाचा. दर्शनी भागावर नेमकी कपड्याची छान छान दुकानं आहेत. मॉल जेव्हा पहिल्यांदा सुरू झाला तेव्हा मी कॉलेजात होते . दुपारी परतताना त्या कपड्यांच्या दुकानात असलेल्या मॉडेलवर नजर टाकणे हा छंद होता. काही काही ड्रेस खरंच सुंदर असायचे .इतके सुंदर की लगेच घेऊन टाकावेत आणि मिरवावेत असे. पण तेव्हा विद्यार्थीदशेत होते , मिळण्याऱ्या पॉकेटमनीत ड्रेस परवडणारे नव्हतेच आणि मातोश्री भलते लाड पुरवणाऱ्या नव्हत्याच. त्यामुळे विंडो ड्रेसिंगद्वारे नेत्रसुख हा एकच पर्याय होता.

*कट २*
पुढे यथावकाश नोकरी लागली. त्यामार्गे स्वतः ड्रेस विकत घेण्याची पतही आली. आजही त्या मॉलमध्ये ती दुकाने आहेत. दर्शनी भागात छान छान ड्रेस घातलेल्या मॅनेक्वीन आहेत . थोडक्यात मौका भी है और दस्तुर भी . पण आता ड्रेस विकत घ्यायची इच्छा होत नाही. तेव्हा त्या गोष्टीच अप्रूप होत. आजही त्या रस्त्यावरुन जाताना ते सुंदर ड्रेस दिसतात आणि अप्रूप वाटत . पण पुढे जायची इच्छा होत नाही . एखादी गोष्ट अस्पर्श राहावी , ती मिळून तिचं अप्रूपपण संपू नये असं काहीसे फिलिंग येते आणि त्यामुळे पाऊल पुढे टाकलं जात नाही. खूप सारी मेहनत करून एखादी। गोष्ट मिळवावी नि हातात आल्यावर हांतीच्या ! एव्हढ्यासाठी अट्टाहास करत होतो होय अस काहीसं होत.
कदाचित काही गोष्टींची मजा विंडोशॉपिंगमध्येच असावी

सावित्रीबाई फुले

 अकाउंटिंगमध्ये Capital Expenditure नावाची संज्ञा आहे. दीर्घ कालीन फायद्यासाठी केला जाणारा खर्च अस त्याच सामान्यकरण करता येईल. नावाप्रमाणेच या खर्चाचे परतावे मिळायला वेळ लागतो.

भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करण्याऱ्या सावित्रीबाईंनी असाच एक Capital Expenditure त्या काळी महाराष्ट्रच्या समाजकरणात केला होता. या खर्चाची पुरेपूर किंमत त्यांना चुकवावी लागली. शेणगोळे सहन करण्यापासून ते स्वतःच्या घरातून निष्कासित होण्यापर्यत. त्यावेळी त्या डगमगल्या नाहीत . खंबीर राहिल्या. आपलं काम करत राहिल्या.पुढे विसाव्या शतकात त्या खर्चाला गोमटी फळे येऊन मुली शिकू लागल्या. Capital expenditure चा परतावा व्याजासकट डोळ्यात भरेल इतपत..
आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. शाळेत असताना सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत अस शिकवलं गेलं. सावित्रीबाईंचं नक्की काम काय होतं , त्याकामासाठी त्यांना काय सहन करावे लागले हे उमजण्याचे वय तेव्हा नव्हतं. ते कळत गेलं उच्चशिक्षण घेताना. कवडीचा संबंध नसलेले लोकं एवढं शिकायची काय गरज आहे ? शिकून काय दिवे लावणार छाप वाक्य प्रसवू लागले तेव्हा सावित्रीबाईंनी काय सहन केल असेल याची प्रचिती येऊ लागली.
उच्चशिक्षण घेणं आज मुलींसाठी फार अप्रूप राहिलेलं नाही. पण त्याचा पाया सावित्रीबाईंनी रचला. शेणगोळे अंगावर घेत अजिबात विचलित न होता प्रचलित समाजरूढीविरुद्ध जाणं अजिबातच सोपं नाही. ते ही मुली शिकल्या तर नवरा मरेल , घरादारचा नाश होईल इतपत दबाव आणला जात असताना.
काला अक्षर भैस बराबर हे वाक्य गंमतीत बोलायला ठीक आहे. पण सावित्रीबाईंनी तेव्हा पाऊल उचलले नसते तर आपणही अशिक्षित राहिलो असत अस कल्पना करून जरी पाहिलं तरी अंगावर काटा येतो. काहीही असो , तू शिकल पाहिजेच हे संस्कार आईने रुजवले ज्याचा पाया सावित्रीबाईनी रचला . त्याचा फायदा स्वतःच आत्मभान येण्यात झाला . हे आत्मभान मला आणि प्रत्येक मुलीला अनुभवू देण्याऱ्या सावित्रीबाई फुल्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! भारतातील प्रत्येक मुलगी तुमची कायमची ऋणी राहील ...

ओ_वुमनिया

 भारतात स्त्रीशिक्षणाचा पायंडा सावित्रीबाई फुलेंनी पाडला आणि वर्षानुवर्षे अंधारात असलेल्या स्त्रीवर्गाला प्रकाशाची वाट दिसली. सुरुवातीला मुली शिकल्या की डोक्यावर बसतील म्हणून खळखळ करण्याऱ्या भारतीय समाजाने हळूहळू मुलींचं शिकणं मान्य केलं. मात्र या शिकलेल्या मुली आपल्याच ताब्यात राहाव्यात , जुन्या काळापासून आलेल्या परंपरा तश्याच चालत राहाव्यात ही मानसिकता कायम होतीच. त्यामुळे मुली कितीही शिकलेल्या असोत त्यांना घरकाम , स्वयंपाकपाणी आलंच पाहिजे हे कटाक्षाने बघितलं जायच. साधारणपणे बँक , शाळेत नोकरी त्यांनतर वयाच्या पंचविशीपर्यत लग्न , त्यानंतर मुलं अशी व्यवस्था ९०च्या दशकापर्यत कायम होती. थोडक्यात स्त्रियांची भूमिका नेहमीच दुय्यम असणारी. समाजाच्या या मानसिकतेच प्रतिबिंब भारतीय जनमानसावर प्रभाव पाडण्याऱ्या चित्रपट या माध्यमात न पडत तरच नवल. हिंदी / मराठी चित्रपटातील त्या काळच्या नायिका म्हणजे नायकाच्या प्रेमप्रकरणाची गरज भागवण्याऱ्या , पटकथेत चिमूटभर सजवण्यापूरत रोल असण्याऱ्या आणि तो रोलही प्रामुख्याने टिपिकल शामळू मुलींचाच. या मुली जास्तीत जास्त एमए शिकलेल्या असत. त्या खानदान की इज्जत वगैरे मानत, वडीलधार्यांनी ठरवलेल्या स्थळाशी लग्नगाठ बांधण्याऱ्या , त्यासाठी आपल्या प्रेमाला तिलांजली देण्याऱ्या ,लग्नापूर्वी शारीरिक संबंध म्हणजे रौरवनरकाच पाप , नवरा म्हणजे सर्वस्व , लग्नानंतर मुलंबाळात रमण्याऱ्या , सगळं सांभाळून असण्याऱ्या, प्रेमस्वरूप , मातृस्वरूप , वात्सल्यपूर्ण अश्या स्वरूपात असत. त्यांच्या चित्रपटातील अस्तित्वाला तसाही अर्थ चटणीसारखा . तोंडी लावायला.

हे नाहीतर मग या शामळूपणाच दुसरं टोक म्हणजे व्हॅम्प भूमिका करण्याऱ्या स्त्रिया. या बाया व्हिलनला रिझवायच काम करत . अगदीच गरज पडली तर त्याच्या वतीने खूनबिन छळकपट पण करत. पण त्याही चार पाच सीनपुरतं मर्यादित. आखी स्टोरीलाईन हिरो आणि व्हिलनपुरतं सीमित झालेली.
नाही म्हणायला अपवाद अर्थ , मिर्चमसालासारख्या चित्रपटांचा. पण ते तुरळक .
आर्थिक उदारीकरणानंतर मात्र भारतीय समाजात बरेच बदल घडून आले. मेट्रो शहरांचा उदयही ह्याच काळातील. भारतीय समाजात बऱ्यापैकी नवे वारे वाहू लागले ते या काळात.शिक्षणाची गंगा याच काळात घरी पोहोचली आणि या शिक्षणाने आत्मनिर्भर स्वयंपूर्ण बनलेल्या मुलींची एक नवी आत्मविश्वासी पिढी या काळात उदयाला आली.
मल्टीप्लेक्सच्या उदयाने या काळात चित्रपट क्षेत्रातही बदल घडून आले. तेच ते टिपिकल विषय असणाऱ्या चित्रपटाव्यतिरिक्त अनेक विविध विषय हाताळणारे दिग्दर्शक पुढे आले . या दिग्दर्शकानी आर्थिक उदारीकरणात अस्तित्वात आलेल्या नवीन मध्यमवर्गीय समाजाच चित्रण करायला सुरुवात केली. या चित्रपटातूनच मग आतापर्यंत दुय्यम भूमिका असण्याऱ्या , बहुतांशवेळा फक्त नायकाच्या प्रेमपात्राची भूमिका बजवण्याऱ्या , हॅपी एंडिंगपुरतं मर्यादित असण्याऱ्या स्त्रीपात्रांची भूमिका बदलली गेली आणि त्यातूनच पिकू , इंग्लिश विंग्लिशसारखे नवमध्यमवर्गीय नायिकाप्रधान सिनेमे येऊ लागले.
पिकू सिनेमातील पिकू या मिलेनियम पिढीच प्रतिनिधित्व करणारी. जाहिरात क्षेत्रात काम करत असताना स्वतःच्या ९० वर्षाच्या वडिलांचा हेकेखोरपणा सांभाळत त्यांच्यावर तितकेच मनस्वी प्रेम करणारी. पिकूच लग्नाच वय झालेय पण म्हणून ती पूर्वाश्रमीच्या नायिकासारख घराण्यावर बोज टाइप मनस्थिती करून राहत नाही. स्वतःच्या लैगिंक जाणीवांची स्पष्ट कल्पना तिला स्वतःला आहे . त्यासाठी तिला समाजाच्या परवानगीची गरज नाही. तिलाही लग्न करायचं आहे पण ते स्वतःच्या अटीवर. रोजच्या अडचणींना सामोरे जात , त्यावर सोपे तोडगे काढत मनःपूत जगायचा प्रयत्न करणारी मनस्वी पिकू भावते ती यामुळेच. तिला आलेला दिवस भरभरुन जगायचा आहे. त्या दिवसाच्या जिंकण्या हरण्याची पर्वा तिला नाही.
पिकू ही मेट्रो शहरातील मुलगी तर बरेली की बर्फी मधील बिट्टी ही tier 3 सारख्या शहराच प्रतिनिधित्व करणारी. स्त्रियांनी कस नाजूकच असलं पाहिजे , त्यांच्या वागण्या बोलण्यात स्त्री संस्कार झळकलेच पाहिजेत ही समाजाची अपेक्षा. मुलगी साधं कशी बसलीये यावरून तिला जोखल जात असताना बिट्टीच्या वागण्या बोलण्यात दिसणारं सो कॉल्ड पुरुषपण तिच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर बोट (?) रोखतं.बिट्टी बिनधास्तपणे सिगारेट ओढते , स्कुटर चालवते, रोजच्या वरपरीक्षेला कंटाळून घरातून पळूनही जाते. पण बिट्टी ठाम आहे ती तिच्या विचारांवर . आपल्याला कोणत्या प्रकारचा जोडीदार हवाय याची स्पष्ट कल्पना तिला आहे आणि तो मिळेपर्यंत थांबायची तयारी. इतरजणी करत आहेत म्हणून कोणाच्याही गळ्यात हार घालायची तिची तयारी नाही. न पटलेल्या विचारांवर प्रश्न विचारायची हिंमत तिच्यात आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वातील हे बिनधास्तपण , वैचारिक ठामपण तिच्याकडे आकर्षित करायला पुरेस आहे.
क्वीनमधली लग्न मोडल्यावर खचून न जाता नव्याने जगायला सुरुवात करणारी राणी सगळ्यांनाच आवडलेली. पण मला स्वतःला आवडली ती बोल्ड आणि बिनधास्त विजयालक्ष्मी. विजयालक्ष्मी उर्फ व्हीजे ही एकल पालक आहे. पॅरिससारख्या शहरात वेट्रेसच काम करून ती स्वतःच्या मुलाला वाढवतेय. एकल पालक असली तरीही तिला स्वतःच्या शरीराच्या गरजा आहेत आणि त्या गरजांचा उच्चार करण्यात , त्यांना पूर्ण करण्यात तिला कोणत्याही प्रकाराचा अपराधगंड वाटत नाही. स्वतःच आयुष्य उत्फुल्लतेने जगत असतानाच निराश झालेल्या राणीला धीर द्यायचं काम ती सहजतेने करतेय. ही खळाळत हसत प्रसन्न असणारी व्हीजे आपल्या आयुष्यातही एक मैत्रीण म्हणून असायला हवी अस मनापासून वाटत राहतं सिनेमा संपताना.
मुली कितीही कर्तृत्ववान शिकल्या बिकल्या असल्या तरीही त्यांनी पहिलं प्राधान्य द्यावं ते स्वतःच्या घरसंसाराला , मुलांबाळांना. अगदी समाजाच्या शिक्षित वरच्या थरातही ही मानसिकता झिरपलेली आहे. दिल धडकने दो मधील आयेशा ह्या विचारसरणीची बळी आहे. स्वतःच्या भावापेक्षा अधिक कर्तृत्ववान असूनही , घरचा व्यवसाय एकहाती सांभाळायची हिंमत असूनही आयेशा लग्न करते कारण लग्नाचं वय झालेलं असत पण ते लग्नही स्वतःच्या मनाविरुद्ध. लग्न झाल असलं तरीही मी काही करून दाखवू शकते हे घरच्यांना पटवून देण्याची तिची धडपड अस्वस्थ करते. चित्रपटात शेवटी आयेशा स्वतःच्या मनासारखं निर्णय घेते खरी पण वास्तवात किती स्त्रियांना असा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आणि हिंमत असते हा वेगळा मुद्दा. आयेशाची गोष्ट करियरच्या आघाडीवर काही करून दाखवण्याची आस बाळगण्याऱ्या पण घराकडे अगदीच दुर्लक्ष करते ही बया असा समाजाने दिलेला गिल्ट बाळगणाऱ्या स्त्रियांचं प्रातिनिधिक चित्रण करते.
इंग्लिश विंग्लिशमधील शशी आपल्या सर्वांच्याच परिचयाची. मध्यमवयीन गृहिणी हा सर्वच्या दृष्टीने दुर्लक्षित विषय. शशीच शिक्षण तितकेसे नाही , फारसं 'एक्सपोझर' नाही . त्यामुळे स्वतःच्या इंग्रजी माध्यमात शिकण्याऱ्या टीनएज मुलांच्या वेगाबरोबर , बाहेरच नियमित एक्सपोझर असण्याऱ्या आधुनिक नवऱ्याबरोबर जुळवून घेताना तिची दमछाक होतेय. घरच्या लोकांचं प्रत्येक गोष्टीसाठी गृहीत धरलं जाणं तिला अवस्थ करतं पण त्याकडे दुर्लक्ष करत ती स्वतःचा छोटेखानी व्यवसाय सांभाळत आहे. ही विजिगिषु वृत्ती तिला पूर्णत: नवीन देशात राहून नवीन काही शिकायला बळ देते आणि त्यातून आलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर घरातील सदस्यांना प्रत्येक सदस्य समान आहे असं ठामपणे सुनावायची हिंमतही देते! रोजच्या जगण्यातील अडथळ्यांवर मात करत , हिंमतीवर जगण्याऱ्या अश्या अनेक शशी आपल्या आजूबाजूला सापडतील. तुम्हारी सुलूमधली सुलू ही अशीच . स्वतःच अस्तित्व शोधायला उत्सुक असणारी . त्यात अडथळे पार करत स्वतःला सिद्ध करणारी..
मसानमधल्या देवी उर्फ रिचा चद्धाने लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्याच घोर पातक केलेलं आहे. त्यामुळे संस्कृती रक्षणाचा ठेका घेतलेल्या समाजातील सो कॉल्ड कावळ्यांना तिला टोचे मारायचं लायसन्सही मिळालेलं आहे. एका बाजूला हे टोचेही सहन करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रियकराचा झालेला मृत्यूही. मात्र एका क्षणी असह्य होऊन देवी हे दडपण झुगारून देते आणि स्वतःच्या प्रगतीला प्राधान्य देते. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही हा विश्वास ठेवून , बंधन झुगारून ती पुढे पाऊल टाकते. नैतिक अनैतिकतेच ओझं पूर्णपणे स्रियांच्या खांद्यावर टाकून संस्कृती राखायला बघण्याऱ्या समाजाला देवीचं हे पाऊल म्हणजे एक सणसणीत चपराकच आहे.
जाता जाता उल्लेख करावासा वाटतो तो मर्दानीमधील शिवानी रॉयचा. पुरुषी वर्चस्व असण्याऱ्या पोलीस क्षेत्रात असून चाईल्ड ट्रॅफिकिंग रोखणारी , त्यातील गुन्हेगारांना एकहाती शासन करणारी बेडर शिवानी रॉय.शारीरिक आणि मानसिक पातळीवर कमालीचा आत्मविश्वास दाखवत स्त्रिया घाबरट असतात या समाजाला छेद देणारी. तसाच आवर्जून उल्लेख करायला हवा तो NH - १० मधील अनुष्का शर्माच्या भूमिकेचा. नवऱ्याच्या मृत्यूनंतर खचून न जाता , स्वतः जखमी झालेली असूनही नवऱ्याच्या मृत्यूचा बदला घेऊन स्त्री पेटून उठली तर ती कुठल्याही थराला जाऊ शकते याचा प्रत्यय देणारी ही भूमिका. त्याचबरोबर समाजाच्या पितृसत्ताक मानसिकतेवर प्रश्न उठवणारीदेखील.. एक हसीना थी मधील उर्मिलाची भूमिकाही अशीच जबरदस्त. प्रियकराने फसवल्यावर त्यापायी तुरुंगाची हवा खावी लागल्यावर उन्मळून रडून न जाता थंड डोक्याने विचार करत प्लॅनिंग करणारी , आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी जिवाच रान करणारी, प्रेमात स्त्रिया क्षमाशील असतात या टिपिकल मानसिकतेला धक्का देणारी , सूडाने पेटून उठणारी आणि तो सूड घेतल्यावरच शांत बसणारी , दुर्गेचा अवतार धारण करणारी सारिका .. नेहमीच्या समजुतींना धक्का द्यायचं काम ह्या नायिका करतात.
ह्या सिनेमांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यातील नायिका परिस्थितीने गांजलेल्या , टिपिकल मुळुमुळु रडण्याऱ्या नाहीत. त्या बऱ्यापैकी सुखवस्तू घरातील असून पैसा राखून आहेत . वेळ आलीच तर बॅकसीटवर न जाता परिस्थितीशी दोन हात करण्याऱ्या आहेत . पण हे दोन हात करणेही आक्रस्ताळेपणासारख नाही. नीट विचार करून , व्यवस्थित भूमिका घेऊन आपलं नाणं त्या चोख बजावत आहेत. मुख्य म्हणजे आधीच्या नायिकाप्रमाणे बाबा वाक्य प्रमाणम न म्हणता हे अस का ? विचारण्याच धाडस त्यांच्यात आहे. घेतलेले निर्णय निभावण्याची क्षमता देखील आहे. परंपरा वगैरेच्या अति नादाला न लागता लवचिकतेने जगणं त्यांनी स्वीकारलं आहे. ह्या नायिका आधीच्या सिनेमाप्रमाणे प्रेमपूर्ण ,
करुणासिंधू नाहीत. त्यांही इतरांप्रमाणेच हाडामासाच्या आणि मोह , मत्सर , राग , लोभ, प्रेम अश्या विकारांनी युक्त आहेत. किंबहुना अश्या असण्यानेच त्यांचं रियल असणं उठून दिसतं.
या स्त्रिया आपल्या रोजच्या जगण्यात दिसण्याऱ्या आहेत. आपल्यासारखेच रोजचे प्रश्न त्यांना पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरही त्या रोजच्या जगण्यात शोधत आहेत. या स्त्रिया जादूची कांडी फिरवून सुपरहिरोसारख अडचणी संपवून टाकत नाहीत. वास्तव जगासारख त्यावर उपाय शोधतात . ही स्त्रीपात्रे जवळची वाटतात ते वैशिष्टयामुळेच. तर या कणखर , मजबूत स्त्रियांची संख्या समाजात आणि पर्यायाने चित्रपटात वाढो हे या महिलादिनाच विशफुल थिंकिंग !

फणसाच्या आठळ्याची भाजी

 तर मग झाल अस की फणस घरी आणवून, अस्मादिकाना टुकटुक करून, घरच्या मेंब्र गरे खाऊन मोकळी झाली . उरल्या त्या आठळ्या! आंब्यांच्या कोयीप्रमाणे त्य...